Published on Feb 16, 2024 Updated 0 Hours ago

अल्गोरिदमचा फायदा घेणाऱ्या कॉर्पोरेट्स संस्थांनी योग्य कायदा येईपर्यंत अल्गोरिदम प्रणालीमुळे होणारी हानी भरून काढण्यासाठी स्वतःला जबाबदार धरणं आवश्यक आहे.

नवीन तंत्रज्ञानामुळे नव्या जबाबदाऱ्याही येतात

हा लेख AI F4: Facts, Fiction, Fears and Fantasies या मालिकेचा भाग आहे.

मानवी कल्पनाशक्ती ही आपल्या सभोवतालच्या जगातील प्रत्येक गोष्टीचं मूळ आहे. प्रसिद्ध लेखक विल्यम आर्थर वॉर्ड यांनी म्हटल्याप्रमाणे "जर तुम्ही कल्पना करू शकत असाल तर तुम्ही ते तयारही करू शकता."

जगाचा इतिहास पाहिला तर आपल्याला कळेल की कल्पना करणाऱ्या आणि धाडसी अशा लोकांनीच वीज, विमाने, अवयव प्रत्यारोपण, इंटरनेट, मोबाईल फोन यासारख्या अनेक तंत्रज्ञानाचा शोध लावला. आणि या सगळ्याच गोष्टीचा समाजावर दूरगामी परिणाम झाला. जागतिक अर्थव्यवस्था. जगात घडलेल्या औद्योगिक क्रांतीमुळे हे सगळं शक्य झालं. आता घडत असलेल्या चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये अनेक तंत्रज्ञानाच्या अभिसरणामुळे अनेक धाडसी कल्पना पुढे येत आहेत. यात जगभर कुठेही 30 मिनिटांत पोहोचणं, शाश्वत जीवन विकसित करणं, थ्रीडी प्रिंटिंग असलेलं शहर, अंतराळातून शेती व्यवस्थापित करणं, संगणकाद्वारे संवाद साधणं, मानवी मेंदूच्या संज्ञानात्मक क्षमतेइतकीच कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करणं शक्य आहे. आज लोक ज्या अनेक तांत्रिक कल्पनांचा पाठपुरावा करत आहेत त्यापैकी या काही आहेत.

इंटरनेट, मोबाईल फोन, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) आणि सिंथेटिक बायोलॉजी यासारखे सर्व तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे तयार करता येते.

या प्रकारच्या धाडसी तांत्रिक कल्पनांमुळेच नावीन्यता येते आणि समाजावर परिणाम होतो. आपल्या इतिहासात अनेक सामान्य उद्देश तंत्रज्ञान (GPT) आहेत. हे तयार करण्यासाठी देखील आपला बराच वेळ गेला. यामुळे आपल्या समाजात, अर्थव्यवस्थांमध्ये आणि घरांमध्ये गती आली. मात्र इंटरनेट, मोबाईल फोन, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) आणि सिंथेटिक बायोलॉजी यासारखे सर्व तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे तयार करता येते. हे जलद एकत्रीकरण एक प्रचंड आर्थिक आणि सामाजिक संधी निर्माण करते. मात्र याबरोबरच मोठी संकट देखील येऊ शकतात.

सामाजिक एकसंधता आणि मानवी कल्याण 

आपण उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या प्रसाराच्या युगात जगत असताना, लोकांच्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकणाऱ्या तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचं कौतुक करणं योग्य नाही. सोशल मीडियाचा आपल्या समाजाच्या बेसिक फॅब्रिकवर अप्रमाणित असा प्रभाव दर्शविण्याचे हे सर्वोत्तम उदाहरण आहे. सोशल मीडिया हा तांत्रिक कल्पनांच्या आधारे तयार करण्यात आला होता. याचं मुख्य उद्दिष्ट होतं ते म्हणजे असा एखादा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करणं जिथे प्रत्येकजण त्याच्या सर्व मित्रांच्या संपर्कात राहू शकेल. मग पुढे हे व्यासपीठ मित्रांशी संपर्क ठेवण्यास मदत जरी करत असेल तरी त्याचा व्यवसायांसाठी उपयोग करण्यात आला. यावरून जाहिराती दाखवल्या गेल्या. एवढंच नाही तर दहशतवादी संघटनांनी विध्वंस करण्यासाठी देखील याचा वापर केला. पुढे वर्ष सरली, अल्गोरिदम बदलू लागले आणि तंत्रज्ञानशास्त्रज्ञ आणि सॉफ्टवेअर अभियंत्यांना अल्गोरिदमिक सिस्टम डिझाइन केले. जेणेकरून लोक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपला जास्तीत जास्त वेळ व्यतीत करतील आणि शक्य तितक्या जाहिराती पाहू शकतील. फेसबुक हे याचच एक उदाहरण आहे जिथे 97.5 टक्के कमाई जाहिरातींमधून येते. सामाजिक प्रभावाचा विचार न करता जाहिरात कमाईवर एकेरी लक्ष केंद्रित करणाऱ्या कॉर्पोरेट निर्णयांमुळे संपूर्ण लोकसंख्येच्या मानसिक आरोग्यावर अनेक परिणाम झाले आहेत.

पुढे वर्ष सरली, अल्गोरिदम बदलू लागले आणि तंत्रज्ञानशास्त्रज्ञ आणि सॉफ्टवेअर अभियंत्यांना अल्गोरिदमिक सिस्टम डिझाइन केले. जेणेकरून लोक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपला जास्तीत जास्त वेळ व्यतीत करतील आणि शक्य तितक्या जाहिराती पाहू शकतील.

वैयक्तिक स्तरावर अल्गोरिदमिक हे केवळ कॉर्पोरेट प्रोत्साहनासाठी अनुकूल होते. मात्र त्याचा मानसिक आरोग्यावरही विपरित परिणाम झाला. वॉल स्ट्रीट जर्नलने टिक टॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या अल्गोरिदमवर एक शोध पत्रकारिता अहवाल सादर केला होता. यात त्यांना आढळलं की दर्शकांना स्वारस्य असलेल्या प्रकारचे वर्गीकरण दाखवण्यात ते सक्षम होते. मात्र चिंतेची बाब अशी आहे की, दर्शकांना जे आवडतं त्याही पेक्षा ते ज्यात स्वारस्य नाही ते देखील तासन तास बघत बसतात. ज्यापासून ते सर्वात "असुरक्षित" आहेत. फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरणारी किशोरवयीन मुलं, विशेषतः मुलींच्या शरीराच्या प्रतिमेच्या समस्या वाढवतात. मेटाला याची जाणीव आहे आणि तरी त्यांचे प्लॅटफॉर्म मुलांसाठी आणि किशोरांसाठी सुरक्षित नाहीत. आत्महत्या केलेल्या किशोरवयीनांच्या सोशल मीडियाच्या वापरावरील अभ्यासात असं आढळलं की, ही मुलं सायबर पीडित आहेत, मानसिकरित्या ते यात गुरफटले आहेत. सोशल मीडियावरील एआयचे हे नकारात्मक परिणाम पूर्णपणे व्यवस्थापित केले गेले नाहीत आणि त्यामुळे आजही हानी होत आहेत.

सामाजिक स्तरावर, डाउनस्ट्रीम ऑर्डर इफेक्ट्सचा विचार न करता कॉर्पोरेट इन्सेंटिव्हला विशेष प्राधान्य दिल्यामुळे समाजाचा तोल ढळला आहे. सेंटर फॉर ह्युमन टेक्नॉलॉजीने अझा रस्किन आणि ट्रिस्टन हॅरिस यांच्या एआय डिलेमा सादरीकरणात अलोन सोसायटीच्या प्रभावाची रूपरेषा दिली आहे. या प्रेझेंटेशनमध्ये, त्यांनी एआयसह समाजाच्या पहिल्या संवादामध्ये फरक निर्माण केला जो सोशल मीडियाद्वारे होता. आणि ते सध्याच्या आणि उदयोन्मुख जनरेटिव्ह एआय टूल्सच्या सहाय्याने 2023 मध्ये होणाऱ्या एआयसह समाजाचा दुसरा परस्परसंवाद लेबल करतात. माहितीचा ओव्हरडोस, डोमस्क्रोलिंग, व्यसन, लहान मुलांचे लक्ष वेधणे, लैंगिकीकरण, ध्रुवीकरण, बनावट बातम्या, कल्ट फॅक्टरी, डीपफेक बॉट्स आणि लोकशाहीचे विघटन हे असे काही घटक आहेत ज्यामुळे समाजाची हानी होत आहे. हे घटक सोशल मीडियासह समाजाच्या अल्गोरिदमिक परस्परसंवादातून ओळखले गेले आहेत. सॉफ्टवेअर डेव्हलपर्सचा दुर्भावनापूर्ण हेतू नसतानाही त्यांनी प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त प्रतिबद्धता वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिलेले अल्गोरिदम तयार करण्यावर लक्ष केंद्रित केलं. आणि हे करताना त्यांनी समाजाप्रती असलेल्या त्यांच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष केले. रस्किन आणि हॅरिसचे एआय मूल्यांकन हे पुढील परस्परसंवादात सामाजिकदृष्ट्या काय उलगडत आहे हे सांगते. यातून प्रत्येक गोष्टीच्या अतिरेकामुळे घडणारी वास्तविकता समोर येते.  त्यांच्या द कमिंग वेव्ह या पुस्तकात, गुगलच्या डीप माईंडचे संस्थापक, मुस्तफा सुलेमान यांनी देखील कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. यात जनरेटिव्ह एआयच्या सर्वव्यापी स्वरूपाबद्दल आणि सायबरवेपन्सची निर्मिती, कोड आणि आपले जीवशास्त्र यांच्या  क्षमतेबद्दल लिहिण्यात आलंय. दररोज उलगडणाऱ्या या चिंता पूर्णपणे व्यवस्थापित केल्या गेल्या नाहीत तर त्याचे लक्षणीय धोके आहेत.

सॉफ्टवेअर डेव्हलपर्सचा दुर्भावनापूर्ण हेतू नसतानाही त्यांनी प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त प्रतिबद्धता वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिलेले अल्गोरिदम तयार करण्यावर लक्ष केंद्रित केलं. आणि हे करताना त्यांनी समाजाप्रती असलेल्या त्यांच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष केले.

विद्यमान अल्गोरिदमच्या सामाजिक आव्हानांचा सामना करणे महत्त्वाचे असताना, नवीन अल्गोरिदम आणि नवीन मार्ग आहेत ज्याद्वारे ते आपल्या जीवनात खोलवर अंतर्भूत केले जातील.

नवीन कल्पना, नवीन तंत्रज्ञान, नवीन जबाबदाऱ्या

युजेनिया कुयडाच्या जिवलग मैत्रिणीच्या निधनानंतर दु:खाचा सामना करण्यासाठी, स्वतः बरोबर बोलण्यासाठी म्हणून एक एआय बॉट तयार केला. तिने हे केले जेणेकरून ती निधन पावलेल्या लोकांशी गप्पा मारू शकेल. या अनुभवातून, तिने रेप्लिका ही कंपनी तयार केली जिथे कोणीही चॅट करण्यासाठी वैयक्तिक एआय मित्र तयार करू शकतो. 

यात बरेच आनंदी वापरकर्ते आहेत ज्यांना वाटते की त्यांना एक मित्र सापडला आहे आणि या डिजिटल अल्गोरिदमिक साथीने त्यांचा एकटेपणा दूर केला आहे. खरं तर, रेप्लिका आणि इतर डिजिटल साथीदार एआय कंपन्या वाढत्या सामाजिक समस्येचे निराकरण करणारे एक मौल्यवान तंत्रज्ञान तयार करत आहेत. मे 2023 मध्ये यूएस सर्जन जनरल यांनी एकाकीपणा आणि सामाजिक अलगावच्या सार्वजनिक आरोग्य संकटाची हाक देणारा सल्लागार अहवाल जारी केला. सध्या, जगातील दोन देशांनी (अमेरिका आणि जपान) एकाकीपणासाठी मंत्री नियुक्त केले आहेत. मात्र अभ्यास दर्शवितो की एकाकीपणा आणि सामाजिक बहिष्कार याची मूळ आफ्रिका, भारत तसेच जगाच्या इतर भागांमध्ये मजबूत आहेत. मात्र या ठिकाणी त्याचा अभ्यासच झालेला नाही. 

कृत्रिम बुद्धिमत्तेचे सोशल मीडियावर झालेले प्रतिकूल सामाजिक परिणाम लक्षात घेता, एकटेपणाची वाढती समस्या दूर करण्यासाठी नवीन एआय आधारित चॅटबॉट्स आणि डिजिटल साथीदार तयार केले जात आहेत. मात्र हे करत असताना "मानवी तंत्रज्ञानाचे तीन नियम" बघावे लागतील. यातील पहिल्या नियमाचा विचार करणे अत्यावश्यक ठरेल. सेंटर फॉर ह्युमन टेक्नॉलॉजीनुसार, "जेव्हा तुम्ही नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावता, तेव्हा तुम्ही जबाबदाऱ्यांचा एक नवीन वर्ग तयार करता." हा नियम केवळ नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावणाऱ्यांसाठीच नाही तर हे तंत्रज्ञान वापरणाऱ्या सर्वांना लागू होतो. वैयक्तिक डेटा कसा व्यवस्थापित केला जातो याचे नियमन करणाऱ्या युरोपियन युनियनच्या जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन (GDPR) धोरणामध्ये असं म्हटलंय की, संगणक तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवू शकतो. मात्र जर एखाद्या व्यक्तीला या एआय सहचराशी लग्न करायचे असेल तर? त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असतात त्यांना त्यांच्याशिवाय दुःख होऊ नये किंवा त्यांना एकटे वाटू नये यासाठी कायदे करणं आवश्यक आहे. 

वैयक्तिक डेटा कसा व्यवस्थापित केला जातो याचे नियमन करणाऱ्या युरोपियन युनियनच्या जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन (GDPR) धोरणामध्ये असं म्हटलंय की, संगणक तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवू शकतो.

कालांतराने, विद्यमान आणि नवीन एआय तंत्रज्ञानाचे सामाजिक परिणाम कमी करण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी नवीन सरकारी धोरणे आणि नियम अस्तित्वात येतील. तरीही, तांत्रिक प्रगतीची सध्याची स्थिती नियमावलीच्या गतीपेक्षा जास्त आहे. नियमन नसल्याचा अर्थ असा नाही की कंपन्यांनी त्यांची जबाबदारी सोडून द्यावी. आजच्या जगात जिथे एकाकीपणा आणि अलगाव वाढत आहे, अल्गोरिदम डिझाइन करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं की, सामाजिक एकसंधता नष्ट होऊ नये, किशोरांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारी अल्गोरिदम प्रणाली तयार करू नये. जे इतरांनी तयार केलेल्या अल्गोरिदमचा फायदा घेतात अशांनी अल्गोरिदमिक प्रणालीमुळे कोणतीही हानी होणार नाही याची खात्री करण्यासाठी स्वतःला आणि इतरांना जबाबदार धरणं आवश्यक आहे.

दरम्यान, आज आपण सर्वांनी जी तांत्रिक कल्पना स्वीकारली पाहिजे त्या अल्गोरिदमिक प्रणालीची रचना करणं आवश्यक आहे. अशी रचना जी मानवी उत्कर्षासाठी आणि सामाजिक-आर्थिक समृद्धीसाठी प्रोत्साहन देते.

लिडिया कोस्टोपोलोस ह्या एक धोरण आणि नवकल्पना सल्लागार आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.