Published on Oct 20, 2023 Commentaries 0 Hours ago

शहरातील श्मशानभूमी आणि स्मशानभूमीचे धोरण, रचना आणि कार्य यांचा पुनर्विचार करणे शहर जगण्यायोग्य आणि मरण्यास सक्षम बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

मृत्यू आणि शहर: मृतांसाठी शहरी जागांचा पुनर्विचार

जगभरातील शहरांमध्ये रोज लोकसंख्या वाढत आहे आणि वाढणाऱ्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी शहरांची धडपड सुरू झालेली. हे होत असताना दुसरीकडे शहरी समूह त्यांच्या मृतांना सामावून घेऊ शकत नाही ही विडंबनाच म्हणावी लागेल. याशिवाय मृत्यूच्या संस्कारासाठी लागणाऱ्या पुरेशा सुविधा आणि सार्वजनिक जागांच्या वाढत्या मागणीमुळे अंत्यसंस्काराचा खर्च जास्त होत आहे. या ठिकाणी शहरांनी जिवंत विरुद्ध मृतांना निवारा प्रदान करण्यासाठी आपला प्राधान्यक्रम ठरवला पाहिजे.

शहरांमध्ये मृतांसाठी जागांची कमतरता आणि स्मशानभूमी बांधण्यासाठी तिच्या देखरेखीसाठी निधीची कमतरता जाणवत असते. विशेषता दाट लोकवस्ती आणि कमी उत्पन्न असलेल्या परिसरामध्ये हा प्रश्न अधिक गडद होताना दिसतो. दुसरीकडे अशा महत्त्वाच्या सार्वजनिक जमिनींच्या वापरासाठी मास्टर प्लॅन फारसे उपयोगी पडत नाहीत. त्याचा परिणाम असा होतो अनियोजित शहरी विकास आणि जमिनीचे नूतनीकरण प्रलंबित राहते. त्यावर शहराचे अंदाजपत्रक देखील परिणाम करते दुसरीकडे योजनाकारांना संभाव्यतेची जाणीव होण्यापासून रोखते.

शहरांमध्ये मृतांसाठी जागांची कमतरता आणि स्मशानभूमी बांधण्यासाठी तिच्या देखरेखीसाठी निधीची कमतरता जाणवत असते. विशेषता दाट लोकवस्ती आणि कमी उत्पन्न असलेल्या परिसरामध्ये हा प्रश्न अधिक गडद होताना दिसतो.

कोविड-19 च्या महामारीच्या काळामध्ये झालेल्या मृतांची विल्हेवाट लावण्यासाठी अनेक गंभीर आव्हाने आपल्यासमोर आणली आहेत. या गंभीर समस्यांचे निराकरण शहरे कसे करू शकतात, अंत्यसंस्कार आणि दफन करण्याच्या जागेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेशा सुविधांची खात्री करून देणे आव्हानात्मक आहे. त्यावरील दीर्घकालीन परिणामांचे मूल्यांकन कसे केले जाऊ शकते? सुलभ आणि सर्वांना परवडणारी, पोहोचण्यासाठी योग्य अशी स्मशानभूमी बनविण्यासाठी शहरे चांगले उपाय कसे देऊ शकतात?

शहरातील मृतांचा संघर्ष

स्मशानभूमी आणि दफनभूमी या जागा शोक व्यक्त करण्यासाठी तसेच अंतिम शारीरिक भेटीचे ठिकाण म्हणून मानवी जीवनामध्ये महत्त्व राखतात. मानव जातीसाठी मृतांची विल्हेवाट लावणे हे उच्च पवित्र भावनिक आणि तात्विक मूल्य आहे. अनेकदा अंतिमसंस्कार तणाव आणि निषिद्धांची संबंधित आहे. अशाप्रकारे मृतांसाठी शहरी जागा शहराच्या सांस्कृतिक भूगोल आणि सामाजिक पायाभूत सुविधांचा एक भाग बनतांना दिसतात. ज्या ठिकाणी प्रेम आणि आदराचे अंतिम समर्पण केले जाते. दुसरीकडे, मृतांसाठी शहरी मोकळ्या जागा देखील आहेत ज्यांना अनेकदा भेदभाव आणि विरोधाचा सामना करावा लागतो. तरीही, ते शहरी वातावरणातील सर्वात दुर्लक्षित भूदृश्यांपैकी एक आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर सिंगापूर मधील नागरिकांच्या निषेधाचा विचार करणे अत्यावश्यक ठरते. सिंगापूर मध्ये घरे आणि महामार्गाच्या विकासासाठी डझनभरावर स्मशानभूमी साफ करण्यात आल्या. सिंगापूर मध्ये विकसित करण्यात आलेले नवीन दफन धोरण आता दफनभूमीच्या जमिनीचा वापर करण्यासाठी पंधरा वर्षापर्यंत मर्यादित राहणार आहे. या नियोजनासमोर कठोर झोनिंग कायदे अमृत भाडे कालावधी याबरोबरच इतर नियमक आव्हाने उभी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. बर्लिन मध्ये स्मशानभूमीचे रूपांतर

 उद्याने, क्रीडांगणे आणि गृहनिर्माण झोनमध्ये केले जात आहे. तर दुसरीकडे पॅरिस मध्ये अस्थिसंस्था ध्वनींग आणि बिल्डिंग मध्ये आव्हाने उभी करत आहेत. मुंबईचा विचार करता 2034 च्या विकास आराखड्यामध्ये स्मशानभूमी आणि उद्यानासाठी समान भूखंड आरक्षित केला होता. त्याच्यासमोर चिन्हांकित त्रुटीसाठी टीका करण्यात आली होती.

मानव जातीसाठी मृतांची विल्हेवाट लावणे हे उच्च पवित्र भावनिक आणि तात्विक मूल्य आहे. अनेकदा अंतिमसंस्कार तणाव आणि निषिद्धांची संबंधित आहे.

भारताचे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय भौगोलिक आणि सामाजिक समस्यांचा विचार करताना दफन आणि स्मशानभूमीचे स्थान, क्षेत्र मर्यादा नियंत्रित करण्यासाठी आवश्यकता निर्दिष्ट करते. तथापि ग्राउंड रियालिटी असे मार्गदर्शक तत्व निरर्थक असल्याचे सिद्ध करू शकतात. उदाहरणार्थ, नागपूरच्या नियोजन विभागाची असंवेदनशीलता त्याच्या मृत व्यक्तीसाठी जमीन संपादित करण्याच्या त्याच्या प्रासंगिक आणि विलंबित दृष्टिकोनातून दिसून येते. त्याचबरोबर शहराच्या जलद विस्तारीकरणामुळे अमृतसर मध्ये स्मशानभूमीवर ताण आलेला दिसत आहे. मुंबईमधील एका मासेमारी गावातील रहिवाशांनी तक्रार केली की दाट लोकवस्तीच्या गावामध्ये स्मशानभूमी नसल्याने समुदायाच्या सदस्यांना मृत्यूचे संस्कार करण्यासाठी लांबचा आणि जिकरीचा प्रवास करावा लागतो.[1] अशा विविध आव्हानांमुळे अंत्यसंस्कार हे एक महागडे, गैरसोयीचे आणि दुःखाच्या क्षणी दीर्घकाळ लक्षात राहणारे प्रकरण बनतात.

कार्यात्मक स्मशानभूमी आणि दफन स्थळे बांधणे त्यांची देखभाल करणे स्थानिक शहरी संस्थांवर मोठा भार टाकू शकतात. त्या ठिकाणी आधीच निधीची कमतरता जाणवत असते. अपुऱ्या साधनांमुळे तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तुटपुंजे आणि अनियमित पगार मिळतो. बेंगळुरूच्या लेकबेड्सचे स्मशानभूमीत रूपांतर करण्यात आले. जे जागेची आणि आर्थिक कमतरता दर्शवते. शिवाय, अंत्यसंस्कार आणि दफन यांचा शहरी वातावरणावर लक्षणीय परिणाम होतो. ज्या ठिकाणी आधीपासूनच वायू आणि जलप्रदूषण प्रश्नाच्या चिंता आहेत.

कार्यात्मक स्मशानभूमी आणि दफन स्थळे बांधणे त्यांची देखभाल करणे स्थानिक शहरी संस्थांवर मोठा भार टाकू शकतात.

जगभरातील शहरांनी त्यांच्या मृत नागरिकांची आठवण ठेवण्यासाठी आणि सन्मान, स्मरण करण्यासाठी पर्यायी आणि पर्यावरणीय मार्ग शोधले पाहिजेत. उदाहरणार्थ, सार्वजनिक कोलंबेरियमचा पर्याय प्रदान करते जेथे अंत्यसंस्कार केलेल्या राखांचे कलश ठेवले जातात. तथापि, या सुविधेसाठी लहान जागा मिळविण्यासाठी पाच वर्षांचा प्रतीक्षा कालावधी आहे. मागणी लक्षात घेऊन, हाँगकाँगने समुद्रात 370,000 कलश ठेवण्यासाठी प्रस्तावित फ्लोटिंग इटर्निटी नावाच्या ऑफ-शोअर कोलंबेरियम बेटासाठी एक नमुना  विकसित केला आहे. शहरात मृत्यूचे संस्कार करण्यासाठी प्रभावी मार्ग, कार्यशील, नागरिक-अनुकूल, शाश्वत आणि सहकारी विचारात घेण्याची गरज आहे.

शहरी सार्वजनिक जागा पायाभूत सुविधांचा भाग

अनेक आंतरराष्ट्रीय त्याबरोबरच भारतीय फ्रेमवर्क राज्य आणि स्थानिक प्राधिकरणांना स्मशानभूमी, दफनभूमीच्या परिणामकारकता त्याबरोबरच टिकाऊपणासाठी जबाबदार धरतात. दावा असणाऱ्या आणि दावा नसणाऱ्या मृत व्यक्तींसाठीच्या जागा सुनिश्चित केल्या जातात. अशा जागा चिन्हांकित करून त्यांची योग्य देखभाल देखील केली जावी या नियमांवर जोर देण्यात आलेला आहे. भारताच्या बाबतीत, मृतांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कोणताही विशिष्ट कायदा नाही; तथापि, भारतीय राज्यघटनेचे कलम 21 मृत व्यक्तीचा सन्मान करण्याचा मुद्दा मांडते.

अलिकडच्या वर्षांत शहरातील स्मशानभूमी आणि दफनभूमीचे शहरी सार्वजनिक जागांमध्ये रूपांतर करण्याची कल्पना लोकप्रिय झाली आहे. नियोजक आणि वास्तुविशारद त्यांच्या डिझाईन्स आणि फंक्शन्समध्ये दोलायमान सार्वजनिक जागा म्हणून बदल करत आहेत जे अनेक उद्देश पूर्ण करू शकतात. या जागांच्या निराशाजनक आणि अस्वस्थतेच्या पलीकडे जाऊन, नियोजक स्मशान दफन क्षेत्राचे मूल्यमापन करत आहेत. जे सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सुलभ आणि शहराच्या पायाभूत सुविधांचा भाग बनू शकतात. अशा प्रकारचे मूल्यमापन नागरी योजनांना उदयोन्मुख ट्रेंड एकत्रित करताना धोरणात्मक जमिनीच्या वापरातील अडचणी आणि संधींचे विश्लेषण करण्यात मदत करू शकणारे आहेत.

गुजरातच्या अमलसाडमधील उडान स्मशानभूमी, एका खाजगी ट्रस्टने कार्यान्वित केले आहे. नागरिकांच्या दैनंदिन वापरासाठी सार्वजनिक जागा समाविष्ट करून शहरी चैतन्य पुनर्संचयित करण्यात आले आहे. डिझाइनमध्ये एक प्रवेशद्वार प्लाझा, मुलांसाठी खेळण्याची जागा आणि त्याच्या कार्यात्मक उद्देशाच्या भावना आणि तत्त्वज्ञान लक्षात घेऊन एक आध्यात्मिक उद्यान समाविष्ट आहे. तसेच, जामनगरच्या माणेकभाई मुक्तिधाम, 1940 मध्ये बांधण्यात आलेले स्मशान उद्यान, स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणात एक चांगली रचना केलेली बाग, चित्रे, विधाने आणि भित्तिचित्रे आहेत. त्याचप्रमाणे, रशियाच्या स्पेस ऑफ सायलेन्स संकल्पनेच्या प्रकल्पामध्ये अंत्यसंस्कार समारंभ हॉल, एक स्मारक संग्रहालय आणि उद्यान यांचा समावेश आहे.

ऑस्लो, नॉर्वे आणि कोपनहेगन, डेन्मार्क येथील केस स्टडीज शहरी वातावरणामध्ये स्मशानभूमीचे योगदान बहुकार्यात्मक सामायिक जागा म्हणून स्पष्ट करतात. अशी उदाहरणे शहरी स्थापत्यकलेसाठी समकालीन फ्रेमवर्क आणि मृतांसाठीच्या जागांचा शहरी सार्वजनिक जागा म्हणून पुनर्विचार करण्याच्या नियोजनास प्रेरणा देऊ शकतात जी सर्वसमावेशक, खुली आणि सहज उपलब्ध आहेत.

शहरे मरण्यायोग्य बनवणे

सध्याच्या परिस्थितीमुळे शहरी स्मशानभूमी आणि  स्थितीचा सखोल अभ्यास, संशोधन करण्याची गरज आहे. तर विस्तारासाठी नवीन जागा आणि जगण्यासाठी पर्यायी पद्धतींचा प्रस्ताव देखील आहे.

  • सध्याच्या जागांची वेळेवर देखभाल आणि सुधारणा केल्याने कुटुंबांसाठी प्रतीक्षा वेळ कमी करताना विद्यमान सुविधांची क्षमता वाढवण्यासाठी ते अधिक कार्यक्षम बनवू शकतात. या जागांची योग्य देखभाल आणि अंधाधुंद व्यवस्थापन करण्यासाठी चिंतेकडे लक्ष वेधण्यासाठी आणि नागरी समाजाच्या सहभागासह विविध भागधारकांमधील संवाद सुरू करण्याचे आवाहन महत्त्वाचे आहे.
  • आपल्या प्रियजनांची अंत्यसंस्काराद्वारे विल्हेवाट लावण्याची संपूर्ण प्रक्रिया नागरिकांसाठी कमी तणावपूर्ण असली पाहिजे. याची खात्री करण्यासाठी सांस्कृतिक आणि भौगोलिक परिस्थितीच्या आधारावर शहरांनी स्थानिक प्रादेशिक नवीन स्थानांसाठी धोरणात्मक पणे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे.
  • डिजिटल मॅपिंग आणि डिझाईन पध्दती सामुदायिक सुविधा एकत्रित करण्यासाठी जागा वाढवणे आणि भूखंड वाटप करणे सुलभ करू शकतात. किमान पर्यावरणीय प्रभावासह जमीन वाटप आणि झोनिंगसाठी योग्य पुरवठा आणि मागणीच्या आवश्यकतांचा अंदाज लावणे ही मुख्य गोष्ट असेल. ही जागा कला प्रतिष्ठान आणि प्रदर्शनांद्वारे शहराची संस्कृती आणि इतिहास देखील प्रदर्शित करू शकतात, ज्यामुळे ते दृश्यास्पद बनू शकतात.
  • शहरातील स्थानिक संस्थांनी (ULBs) ULB ला चालना देण्यासाठी पुरेशा सुविधा पुरवण्यासाठी आणि विशेष बजेटची योजना आखण्यासाठी लक्ष दिले पाहिजे. त्याबरोबरच बजेटची योजना आखण्यासाठी नवीन स्थानांसाठी, अतिरिक्त निधी उभारण्यासाठी, गुंतवणुकीच्या संधी निर्माण करणे,  खाजगी भागीदारांसोबत सहकार्य करणे या गोष्टींवर लक्ष दिले पाहिजे. करांना प्रोत्साहन आणि इतर आर्थिक परतफेड लागू केल्याने विल्हेवाटीची जागा बदलण्यात खाजगी स्वारस्य आणि सहभागास प्रोत्साहन मिळण्याची शक्यता वाढते. विविध सामुदायिक आणि धार्मिक ट्रस्ट आणि परोपकारी संस्था आणि अगदी व्यक्तींनीही अशा सुविधांच्या सुशोभीकरण आणि देखभालीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कदाचित, हे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) चा भाग देखील सक्रियपणे मानले जाऊ शकते.
  • पर्यायी ट्रेंड, जसे की हरित अंत्यसंस्कार, पर्यावरणपूरक नैसर्गिक दफन पट्टे आणि वनस्पतिवत् स्मशानभूमी, शहराच्या हरित पायाभूत सुविधांचे बहुकार्यात्मक नेटवर्क म्हणून धोरण तयार करण्याचा एक भाग बनवता येईल. उदाहरणार्थ, भारताच्या नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा ने एक पाऊल पुढे टाकत सुधारित आणि ग्रीन स्मशानभूमीसाठी मॉडेल समोर आणले आहे.
  • शहरी केंद्रे धार्मिक आणि सांस्कृतिक भावनांचा विचार करून मेटाव्हर्समध्ये आभासी स्मशानभूमी आणि कबरीकडे स्थलांतरित करण्यासाठी नाविन्यपूर्ण डिजिटल तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीमध्ये गुंतवणूक करण्याकडे लक्ष दिले जाऊ शकते. यामुळे पर्यावरणातील अडथळे कमी होतीलच शिवाय ऑनलाइन उपलब्ध सेवा आणि स्थान शोधून शोकग्रस्त कुटुंबांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. उदाहरणार्थ, जपानने महामारीच्या काळात ऑनलाइन भेटीसाठी त्याच्या स्मशानभूमींचे आभासी वास्तविकतेचा  अनुभव देणारे तंत्रज्ञान तयार केले होते. तंत्रज्ञानाच्या दुसर्‍या वापरात, क्वालालंपूरच्या मोठ्या मशीनीकृत कोलंबेरियममध्ये हजारो कलश एका वॉल्टमध्ये संग्रहित आहेत जे इलेक्ट्रॉनिक कार्डद्वारे पुनर्प्राप्त केले जाऊ शकतात.

काही प्रमाणात कठीण आणि गुंतागुंतीचे वाटत असले तरी शहरातील स्मशानभूमी आणि त्यांचे धोरण रचना कार्याचा पुनर्विचार करणे मृतांना योग्यरीत्या सन्मानित करणे यासाठी सर्व समावेशी साईट तयार करणे आवश्यक आहे. शहरातील मोकळ्या हिरव्या जागा महत्त्वाचा भाग बनतात. शहराला निरोगी गतिमान आणि राहण्यायोग्य मरण्यायोग्य बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात.

अनुषा केसरकर गवाणकर या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या सेंटर फॉर इकॉनॉमी अँड ग्रोथच्या वरिष्ठ फेलो आहेत.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.