-
CENTRES
Progammes & Centres
Location
जगातील १९ देश आणि युरोपीय महासंघाचा समावेश असलेल्या जी २० या अनौपचारिक शिखर परिषदेची स्थापना १९९९ च्या सप्टेंबर महिन्यात झाली. सुरुवातीला अर्थमंत्री स्तरापर्यंत मर्यादित असलेली ही परिषद २००८ मध्ये देशांच्या प्रमुखांपर्यंत पोहोचली.
वेगाने बदलणारे जागतिक आर्थिक संदर्भ पाहता या परिषदेने जी ७ गटाला गिळंकृत केले आणि मागेही टाकले. परिषदेपूर्वीच्या बैठकीसाठी संयुक्त राष्ट्रे, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना (ओईसीडी), जागतिक व्यापार संघटना आणि आर्थिक स्थिरता मंडळ या संस्थांना आमंत्रणे देण्यात आली होती. नागरी संघटना, नागरी समाज संघटना, विचार गट आणि सी २०, टी २०, एल २० आणि बी २० यांच्यासारख्या कामगार व उद्योग गटांच्या समांतरपणे स्वतंत्र बैठका झाल्या.
सल्लागार संस्था असूनही एकविसाव्या शतकातील दुसऱ्या दशकात या परिषदेने घेतलेल्या निर्णयांचे महत्त्व आणि प्रभाव लक्षणीयरीत्या वाढला. जागतिक शांतता आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळ जी भूमिका घेते तशीच जागतिक आर्थिक प्रशासनासंबंधीची भूमिका जी २० घेऊ शकते.
गेल्या काही महिन्यांपासून जी २० च्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ती अंतर्गत संघर्षात अडकली आहे, जाहीरनाम्यावर सहमती होणे अवघड झाले. त्यामुळे परिषदेच्या कार्यपद्धतीवर आणि अर्थपूर्ण कार्यक्रमावर त्याचे थेट प्रतिकूल परिणाम झाले. भारताने २०२२ मध्ये परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यामुळे जी २० मधील काही गंभीर समस्या सोडविण्यासाठी कल्पक उपाय सूचविण्याची ही नेतृत्वसंधी आहे.आव्हाने भयावह आहेत. सध्याचा पेच पाहता गंभीर, तातडीच्या अंतर्गत प्रशासकीय सुधारणांची गरज असल्याचे सूचित होत आहे. जी २० परिषद ज्या उद्देशाने स्थापन झाली, ती जागतिक आर्थिक आव्हाने विश्वासार्हपणे सोडविण्यात ही परिषद यशस्वी होत आहे का, यावर त्या सुधारणांची परिणामकारकता समजू शकते.
जर ही परिषद विश्वासार्ह आणि काळाबरोबर चालणारी असावी, असे वाटत असेल, तर या परिषदेने सर्वप्रथम जगाला भेडसावणाऱ्या महत्त्वपूर्ण आणि तातडीच्या समस्या सोडवण्यासाठी काढण्यात येत असलेल्या तोडग्यांवर सहमती करणे भाग आहे.
जी-२० ला पाच प्रमुख आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामध्ये मध्यम आणि अल्प उत्पन्न गटातील देशांच्या वाढत्या अस्थायी कर्जाचा समावेश आहे. दीर्घ कालावधीत पर्यावरणावर ऐतिहासिकदृष्ट्या असमान प्रतिकूल परिणाम करणाऱ्या श्रीमंत देशांनी वचन दिलेले हवामान अर्थपुरवठ्याच्या वाटपात अल्प कामगिरी, हरित उर्जा संक्रमणाची आर्थिक व इतर आव्हाने, सुयोग्य ब्रेटन वुड्स संस्था सुधारणा आणि जागतिक अन्न असुरक्षितता यांचाही या पाच आव्हानांमध्ये समावेश होतो.
चालू वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात बाली येथे झालेल्या बैठकीत सहमतीमध्ये अपयश आले होते. या परिषदेत सन २०१५ मध्ये पॅरिसमध्ये आणि २०२१ मधील सीओपी २६ ग्लास्गो येथे झालेल्या हवामान अर्थपुरवठ्यावर कोणती सहमती झाली होती, त्याचा विचार करण्याची चिंताही वाढली आहे.
जागतिक स्वतंत्र कार्यक्रमामध्ये वाढत्या अस्थिर कर्जांसह स्वच्छ उर्जा परिवर्तनाची बहुविध आव्हाने, जागतिक अन्न सुरक्षा यांचाही समावेश होतो. कर्जाची शाश्वतता, हवामान बदलासंबंधीच्या उपाययोजनांचे यश आणि उर्जा परिवर्तन यांच्याशी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सुधारणा जोडलेल्या आहेत.
सध्याच्या कर्जामधील महत्त्वाचा भाग त्यांच्याकडे असतो आणि त्यांना सहभागी करून घेण्याशिवाय कोणताही ठोस उपाय नाही. जी २० ने व्ही २० शी त्यांच्या चिंता व प्रस्तावित उपायांमध्ये थेट सहभाग नोंदवायला हवा. विशेषतः ते हवामान बदलासंबंधातील उपाययोजना आणि आर्थिक स्वीकारार्हता यांच्याशी कर्जमुक्त धोरण जोडण्यास उत्सुक आहेत.
सध्याच्या कर्ज संकटाशी अधिक परिणामकारक लढा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये सुधारणा करणे तातडीचे आहे. हे करण्यासाठी आवश्यक ती ताकद जी २० कडे आहे. या संदर्भात विशेष महत्त्वाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अधिभार मोठ्या प्रमाणावर कर्ज घेणाऱ्या देशांना परवडणारे नाहीत. त्यामुळे ते त्वरित रद्द करणे आवश्यक आहेत.
भारताला अध्यक्षपदासाठी मोठी आव्हाने आहेत. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे संवादातून सहमती होण्याची शक्यता कमी झाली आहे. हेही एक आव्हान आहेच. यामुळे तीव्र भू-राजकीय आणि भू-आर्थिक संघर्षप्रसंगी भारताला जागतिक नेतृत्व करण्याची आणि मुत्सद्देगिरी दाखवण्याची संधी मिळू शकते. इंडोनेशियाकडून परंपरागत आलेला ठोस कार्यक्रम प्रशासनाशी संबंधित आव्हानांवर मात करण्यासाठी धाडसी आणि कल्पक उपाय सूचविण्यासाठी आणि त्यासह बदलत्या जागतिक परिमाणांशी संबंधित राहण्यासाठी आपली ताकदही दाखवता येईल.
कोव्हिड-१९ हवामान बदलाची आव्हाने आणि स्वच्छ उर्जा परिवर्तनाची तातडीची गरज या संदर्भात भारताने कमी किंमतीमध्ये लस तंत्रज्ञान, प्रभावी लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात वाटप, जेनेरिक औषधांचे उत्पादन आणि सौर उर्जा या क्षेत्रांमध्ये आपले नेतृत्व अधोरेखित करायला हवे. जागतिक अन्न सुरक्षा आणि जगासमोरील अन्य मोठी जागतिक आर्थिक प्रशासनाच्या आव्हानांवरील उपाय सुलभ करण्यासाठी डिजिटल व माहिती तंत्रज्ञानातील जागतिक नेतृत्व कसे मदत करू शकते हेही भारताने दाखवून द्यायला हवे.
अशा कार्याचे दोन महत्त्वाच्या कारणांसाठी केवळ जी २० च्या माध्यमातूनच नव्हे, तर आयबीएसए व्यासपीठाच्या माध्यमातून ‘ग्लोबल साउथ’साठी भरीव अर्थपुरवठा तरतुदीच्या माध्यमातून दाखवून देणे गरजेचे आहे. प्रथम म्हणजे, ब्रिक्स ही आता विश्वासार्ह किंवा सुसंगत संस्था राहिलेली नाही. विशेषतः युक्रेनमधील रशियाचे युद्ध आणि चीनचे हेतू यांसंबंधात प्रादेशिक आणि जागतिक चिंता पाहता, असे म्हणावे लागते. दुसरे म्हणजे, हा एक दुर्मीळ जागतिक संयोगक्षण आहे. आयबीएसएची निर्मिती करणारे तीन प्रमुख विकसनशील देश जी २० चे अध्यक्षपद सलगपणे भूषवतील. हे तीन देश म्हणजे, २०२३ मध्ये भारत, २०२४ मध्ये ब्राझील आणि २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिका. त्यामुळे भारताला तीन वर्षांचा समान जी २० आणि आयबीएसए कार्यक्रम तयार करण्यासाठी पुढे जाण्याची दुर्मीळ संधी आहे. मात्र अध्यक्षपदाचा काळ यशस्वी करायचा असेल, तर त्यांनी या घडीचा लाभ घ्यायला हवा. त्यासाठी तातडीने आणि निर्णायकपणे पुढे जाणे आवश्यक बनले आहे.
हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Kamal Malhotra is Non-Resident Senior Research Fellow at Boston Universitys Global Development Policy Center. He led the UN in Vietnam Turkey Malaysia Singapore and Brunei ...
Read More +