-
CENTRES
Progammes & Centres
Location
आगामी काळात भारत संशोधन आणि विकास केंद्र बनावा, याकरता सेमीकंडक्टर कार्यक्षेत्रात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या गटांना प्रशिक्षित आणि विकसित करण्याची गरज आहे.
‘कौशल्य म्हणजे एखाद्या विशिष्ट वेळेत आणि जोमाने प्रभावी अंमलबजावणी करीत निर्धारित परिणाम मिळवण्यासाठी काम करण्याची शिकून आत्मसात केलेली क्षमता,’ अशी कौशल्याची उत्तम व्याख्या केली जाऊ शकते. ‘डिजिटल क्रांती’ आणि ‘इंडस्ट्री ४.०’ बद्दल बरेच काही बोलले गेले आहे, सध्या सुरू असलेल्या गृहितकांमधील मूलभूत बदलांच्या केंद्रस्थानी चिप आहे. चिपची रचना आणि उत्पादन याचा मुख्य आधार हा कौशल्य-विकासामध्ये आहे. ही कौशल्याची तफावत केवळ आपल्या देशासाठीच नाही, तर उर्वरित जगासाठीही लागू आहे. याला काही वेळा ‘प्रतिभेची कमतरता’ असेही संबोधले जाते आणि वाढती मागणी, भू-राजकीय बदल व कोविड-१९ साथीनंतरच्या जागतिक व्यवस्थेतील हे एक स्पष्ट वास्तव आहे. हा निर्णायक पैलू देशातील सरकार, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांनी अचूक ओळखला आहे आणि त्याला महत्त्व दिले आहे.
सेमीकंडक्टर्स आणि इलेक्ट्रॉनिक्स प्रणाली विकास व देखभाल (इएसडीएम) यांमधील कौशल्य प्राप्त होण्याकरता समज, अंतर्दृष्टी आवश्यक आहे आणि म्हणून ते मूलभूत कामगिरीचा स्तर प्रमाणित करणाऱ्या प्रमाणपत्रांच्या पलीकडे जाते. या क्षेत्रात तज्ज्ञांची टंचाई वाढत आहे आणि म्हणूनच निधी व गुंतवणुकीच्या व्यतिरिक्त अनेक दीर्घकालीन उपाय योजणे आवश्यक आहे. या टंचाईचा थेट विपरित परिणाम आगामी काळात उद्योगाच्या वाढीवर होईल. जगातील तिसरी सर्वात मोठी नवउद्योजकतेसाठीची परिस्थितिकी आणि एक अब्जाहून अधिक ग्राहकांचा आधार असलेला, इंटरनेट वापरकर्त्यांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला, वित्तीय तंत्रज्ञानातील बदलांशी जुळवून घेणारा जगातील अग्रगण्य देश म्हणून, भारत भविष्यातील डिजिटल सत्ताकेंद्र बनण्यासाठी सज्ज आहे. भारताने फॅब्रिकेशन प्रकल्प आणि कंपाऊंड सेमीकंडक्टर्स बनवण्यास सुरुवात करताना आणि धोरणाच्या ठोस चौकटीसह इलेक्ट्रॉनिक्स व्यवस्थेची रचना आणि उत्पादन (इलेक्ट्रॉनिक्स प्रणाली विकास आणि देखभाल) उद्योगाचा उच्च विकास दर स्वीकारत असताना कौशल्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
या क्षेत्रातील तज्ज्ञांची टंचाई वाढत आहे आणि म्हणूनच निधी व गुंतवणुकीच्या व्यतिरिक्त अनेक दीर्घकालीन उपाय योजणे आवश्यक आहे. या टंचाईचा थेट विपरित परिणाम आगामी काळात उद्योगाच्या वाढीवर परिणाम होईल.
संकटकाळात, काही राष्ट्रे सेमीकंडक्टर कार्यक्षेत्रात त्यांच्या स्वत:च्या कुशल कर्मचाऱ्यांचे उच्च मूल्य आकारून प्रशिक्षित मनुष्यबळाची कृत्रिम टंचाई निर्माण करू शकतात.
जग सतत बदलत असते. कोविड-१९ साथीच्या काळात गतिमान लस पुरवठा साखळींनी हे सिद्ध केले की, कुशल मनुष्यबळ हे उच्च मूल्यावर उपलब्ध होईल आणि त्याची किंमत मोजावी लागेल. भविष्यात, संकटकाळात, काही राष्ट्रे सेमीकंडक्टर कार्यक्षेत्रात त्यांच्या स्वतःच्या कुशल कर्मचाऱ्यांवर उच्च मूल्य आकारून, प्रशिक्षित मनुष्यबळाची कृत्रिम टंचाई निर्माण करू शकतात. त्याचप्रमाणे काही राष्ट्रे या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाचा वापर त्यांच्या स्वतःच्या अजेंड्यासाठी आणि हितसंबंधांसाठी करू शकतात. क्षमता निर्माण करण्यास बराच वेळ लागतो, मात्र हेतू रातोरात बदलू शकतात.
भारत सध्या भविष्यात विविध प्रकारच्या अॅप्लिकेशन्ससाठी वैविध्यपूर्ण उत्पादनांच्या निर्मितीच्या श्रेणी आणि गतीच्या वळणबिंदूवर उभा आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स, चिप रचना आणि उत्पादन क्षेत्रांकरता अत्यंत कुशल कामगारांची एक मजबूत परिस्थितिकी तयार करणे अत्यावश्यक आहे. कर्मचार्यांचे कौशल्य हाच ‘आत्मनिर्भर भारता’चा गाभा आहे.
हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
A graduate of Defence Services Staff College and Higher Command Course in the Indian Army as well as an alumnus of the Indian School of ...
Read More +