Author : Snehashish Mitra

Published on Oct 11, 2023 Commentaries 0 Hours ago

भारताने राजकारण आणि लोकशाहीतील त्यांच्या वाढीव सहभागाला प्राधान्य द्यायला हवे. लोकशाहीची मूलभूत तत्त्वे बळकट करण्यासाठी आपली युवा शक्ती उभी केली पाहिजे.

भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी शहरी तरुणांचा सहभाग वाढवणे आवश्यक

महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांच्या अलीकडील अहवालात असे सुचित केले आहे की, 18 ते 19 वयोगटातील राज्यातील एकूण 42, 09, 000 तरुण लोकसंख्येपैकी केवळ 7, 90, 000 तरुणांनी मतदार म्हणून नोंदणी केली आहे. 18-19 वयोगटातील वर्ग राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 4.5 टक्के आहे. परंतु वयोगटातील नोंदणीकृत मतदार राज्याच्या लोकसंख्येच्या केवळ 0.6 टक्के आहेत. मतदार नोंदणी संदर्भाच्या विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये नियमित राज्यव्यापी मोहिमा असूनही 18-19 वयोगटातील मतदार नोंदणीमध्ये किरकोळ वाढ झाली आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये लोकसंख्येच्या 0.3 टक्के तर एप्रिल 2023 मध्ये 0.6 टक्के इतकी वाढ पाहायला मिळते.

हे निष्कर्ष संपूर्ण भारतातील शहरांमध्ये मतदारांच्या उदासीनतेचे स्पष्टीकरण या ठिकाणी देत आहेत. जेथे स्थानिक निवडणुकांमध्ये राज्य आणि राष्ट्रीय स्तरांपेक्षा कमी मतदान होते. विश्लेषण दर्शविते की देशातील अनेक शहरी तरुण त्यांच्या मताधिकाराचा वापर करण्यापासून दूर राहत आहेत. ही चिंता राष्ट्रीय युवा धोरण 2014 मध्ये देखील
अधोरेखित केली गेली आहे. राजकारणात तरुणांच्या अधिक सहभागावर भर देताना हे धोरण तरुणांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी पूरक ठरले आहे का हे तपासणे महत्त्वपूर्ण ठरते. राजकारण आणि प्रशासनात येण्याची तरुणांची उदासीनता येथे अधोरेखित झाली आहे.

जागतिक स्तरावर डेमोग्राफिक डिव्हिडंडच्या फायदेशीर स्थितीबाबत बहुपक्षीय स्तरावर भारतासाठी हा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे.

भारतातील सर्वाधिक शहरीकरण झालेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो. आणि म्हणूनच महाराष्ट्रासारख्या मोठ्या शहरी राज्यात कमी मतदार नोंदणी कडे भारताच्या लोकशाही चौकटीत रचनात्मक तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी पुरेसे धोरणात्मक लक्ष देणे आवश्यक आहे. सर्व समावेशक आणि चैतन्यशील लोकशाहीच्या दिशेने मतदार नोंदणी ही पहिली पायरी म्हणता येईल. विशेषत: भारतातील शहरी भागातील लक्षणीय वाढ लक्षात घेता, मतदार यादीत नाव नोंदवण्याची तरुणांची, विशेषत: शहरी भागातील अनिच्छा दूर करणे आवश्यक आहे. येत्या दशकात लोकसंख्येच्या दृष्टीने जागतिक स्तरावर डेमोग्रफिक डिव्हीजनच्या फायदेशीर स्थितीबाबत बहुपक्षीय स्तरावर भारतासाठी हा मुद्दा देखील महत्त्वाचा ठरणार आहे.

जागतिक लोकसंख्याशास्त्रीय कल: भारताला मोठी संधी

2010-2056 च्या अनुमानित लोकसंख्याशास्त्रीय लाभांश कालावधीत भारताची कार्यरत लोकसंख्या 51 ते 56 टक्क्यांच्या दरम्यान असेल. या उलट इतर अन्य देशांमध्ये कमी होत असलेल्या लोकसंख्येचे आणि कमी जन्म आणि स्थिर मृत्यू दरामुळे कार्यरत लोकसंख्या लक्षणीयरीत्या कमी होताना दिसत आहे. तर पूर्व युरोपीय देशांमध्ये कुशल कामगारांच्या मोठ्या प्रमाणावरील स्थलांतरामुळे लोकसंख्येत घट झालेली दिसत आहे. दुसरीकडे, चीनच्या 35 वर्षांहून अधिक काळ काटेकोरपणे अंमलात आणलेल्या वन-चाइल्ड धोरणामुळे चीनची लोकसंख्या घटल्याने जागतिक आर्थिक वाढीवर परिणाम होण्याची भीती आहे. अहवालामध्ये असेही म्हटले आहे की, रशियाच्या अलीकडील लष्करी चुकीच्या सहासांची माहिती त्यांच्या लोकसंख्या शास्त्रीय मृत्यूच्या प्रमाणासाठी कारणीभूत ठरली आहे. दक्षिण कोरिया आणि जपान सारख्या पूर्व प्रगत आशियाई देशांमध्ये जन्मदर विक्रमी कमी झाल्याने अर्थव्यवस्था मोठ्या सामाजिक सुरक्षेच्या ओझ्यांचा सामना करत आहे. युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था उदारमतवादी लोकशाही तत्त्वांद्वारे शासित जर्मनीने, कामगारांची कमतरता दूर करण्यासाठी आणि युरोपियन युनियनच्या बाहेरील लोकांसह दरवर्षी सुमारे 60,000 नोकऱ्या भरण्यासाठी इमिग्रेशन, कौशल्ये आणि प्रशिक्षणात सुधारणा केल्या आहेत. तथापि, रशिया आणि चीनसह बहुतेक देश अनेक सामाजिक-राजकीय मर्यादांमुळे जर्मनीचे अनुकरण करू शकणार नाहीत.

दक्षिण कोरिया आणि जपान सारख्या पूर्व प्रगत आशियाई देशांमध्ये जन्मदर विक्रमी कमी झाल्याने अर्थव्यवस्था मोठ्या सामाजिक सुरक्षेच्या ओझ्यांचा सामना करत आहे.

जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे आणि सर्वात तरुण राष्ट्र म्हणून भारताने या परिस्थितीचा ताबा घेतला पाहिजे. राजकारण आणि लोकशाहीतील त्यांच्या वाढीव सहभागाला प्राधान्य देऊन आपली मूलभूत लोकशाही तत्त्वे मजबूत करण्यासाठी देशातील युवा शक्ती तयार केली पाहिजे. धोरणकर्त्यांनी वेगाने बदलणाऱ्या जागतिक व्यवस्थेमध्ये तरुणांच्या आकांक्षा लक्षात घेऊन भारताच्या राजकीय आणि लोकशाही प्रक्रियेत तरुणांचा सहभाग सुनिश्चित केला पाहिजे.

राजकारणातील भारतीय तरुण

भारताच्या राजकारणाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘तरुण देश, वृद्ध नेते’. भारतीय राजकारणात ठसा उमटवणारे बहुतेक तरुण नेते हे प्रस्थापित राजकीय घराण्यातील आहेत ज्यांचा मोठा प्रभाव आहे. जरी जवळजवळ प्रत्येक मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षाची कार्यशील विद्यार्थी शाखा आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकांमध्ये जोरदारपणे भाग घेत असले तरी, विद्यार्थी नेत्यांना विधिमंडळाच्या राजकारणात उन्नत करण्यासाठी पद्धतशीर प्रक्रिया आणि मार्गदर्शनाचा अभाव आहे. उदाहरणार्थ, 17 व्या लोकसभेत (2019-2024) निवडून आलेले 12 टक्के खासदार (MP) 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत, तर पहिल्या संसदेत (स्वातंत्र्योत्तर) 26 टक्के खासदार 40 वर्षांपेक्षा कमी आहेत.

विशेष म्हणजे, सर्व प्रमुख निवडणुकांपूर्वी राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांमध्ये महत्त्वाकांक्षी युवा कार्यक्रमांची रूपरेषा छापली जाते. मुद्रित आणि सोशल मीडियाद्वारे मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रचार केला जातो. तरुणाई देखील ठळकपणे राजकीय प्रचार मोहिमांमध्ये कॉन्फिगर करतात आणि राजकीय पक्ष अनेकदा निवडणुकीपूर्वी ताकद दाखवण्यासाठी त्यांच्या सहभागाची जाहिरात करतात. तथापि, तरुणांचे मुख्य मुद्दे-शिक्षण आणि रोजगार याकडे निवडणुकीनंतर कमी लक्ष दिले जाते. जे निवडणुकीच्या चौकटीत त्यांच्या मागण्या एकत्रित करण्याची तरुण मतदारांची क्षमता नसल्याचा संकेत देते. विद्यार्थी नेते विधिमंडळाच्या राजकारणात उतरले तरी त्यांचा फायदा मर्यादितच राहतो. या परिस्थितीत तरुण मतदारांचा कमी सहभाग हा विसंगतीऐवजी अपेक्षित निकालासारखा वाटतो.

तरुणाई देखील ठळकपणे राजकीय प्रचार मोहिमांमध्ये कॉन्फिगर करतात आणि राजकीय पक्ष अनेकदा निवडणुकीपूर्वी ताकद दाखवण्यासाठी त्यांच्या सहभागाची जाहिरात करतात.

तरुणांचा वाढता सहभाग

भारताच्या राजकीय पक्षांनी आणि धोरणकर्त्यांनी तरुणांशी संलग्न होण्यासाठी आणि त्यांना देशाच्या विकासाच्या वाटचालीत सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्याचे मार्ग तयार केले पाहिजेत. प्रतिनिधित्वाच्या पलीकडे तरुणांचा अधिक सहभाग त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर अधिक लक्ष केंद्रित करायला हवे. शिक्षण आणि रोजगाराच्या पारंपारिक आव्हानांसोबतच, शासन यंत्रणेने तरुणांवर परिणाम करणाऱ्या असंख्य समस्यांचे निराकरण केले पाहिजे. उदाहरणार्थ, आर्थिक दबाव आणि पारंपारिक भूमिका यासारखे घटक, जे त्यांना जपान आणि चीन सारख्या विकसित अर्थव्यवस्थांमध्ये परावृत्त करतात. वाढत्या संख्येने स्त्रिया मुले न होऊ देण्याचे निवडत आहेत. हे देखील या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. लग्न येथे समस्या परिणामांशी संबंधित नाहीत तर त्याकडे नेणारे घटक आणि परिणाम कसे व्यवस्थापित केले जातात हे पाहणे आवश्यक आहे. संबंधित सरकारी अहवाल सामाजिक मानसिकतेतील बदलाचा अभ्यास करत असताना, तरुणांना भेडसावणाऱ्या या नवीन वास्तवांना भारत कसा प्रतिसाद देत आहे हे अद्यापही अस्पष्ट आहे. हे जाणून घेण्यासाठी लक्ष केंद्रित करणे देखील आवश्यक आहे.

अशा आव्हानांना तोंड देण्यासाठी द्विपक्षीय दृष्टीकोन आवश्यक आहे. तरुण मतदारांना पटवून देणे की त्यांचे मुद्दे महत्त्वाचे आहेत आणि सरकार आणि धोरणात्मक संस्थांनी सहभागात्मक दृष्टिकोनातून गांभीर्याने घेतले आहेत. भारताच्या निवडणुका आणि लोकशाहीमध्ये सक्रिय तरुणांचा सहभाग सुलभ करण्यासाठी निवडणूक सुधारणा आवश्यक आहे. इतर यशस्वी लोकशाहीतील काही उदाहरणे उपयुक्त संदर्भ या ठिकाणी देतात. टफ्ट युनिव्हर्सिटीचे सेंटर फॉर इन्फॉर्मेशन अँड रिसर्च ऑन सिव्हिक लर्निंग अँड एंगेजमेंट केंद्रित संशोधन करते जे युनायटेड स्टेट्स (यूएस) मध्ये तरुण मतदारांच्या मतदानावर मीडिया इकोसिस्टम, जेंडर आणि तरुण-प्रौढ भागीदारी यांच्या प्रभावाशी संबंध जोडून मतदान वाढवण्यासाठी धोरणाची माहिती देतात. ड्यूक युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात शालेय सहभाग, गैर-संज्ञानात्मक कौशल्ये आणि नागरी वृत्ती या पैलूंचा समावेश करणारे व्यापक शालेय स्तरावरील विद्यार्थी सर्वेक्षण करून यूएसमधील तरुण मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरणात्मक सुधारणांची रचना करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस, अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी इ. सारख्या संस्थांकडून कौशल्य मिळवून भारतात समान धर्तीवर अभ्यास सुरू केला जाऊ शकतो. ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनद्वारे आयोजित #ORFSPARK सारखे विद्यार्थी सहभाग कार्यक्रम विद्यार्थ्यांना समकालीन धोरणाशी जोडत आहेत. लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याची गरज निर्माण करण्यासाठी समस्यांचा विस्तार आणि अनुरूप केला जाऊ शकतो. ऑनलाइन प्रक्रिया वाढविण्यावर आणि सरकारी कार्यालयांना अनेक भेटी कमी करण्यावर लक्ष केंद्रित करून मतदार नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे आवश्यक आहे. या हस्तक्षेपांमुळे शहरी भागातील निवडणुकांमध्ये तरुणांचा कमी सहभाग आणि त्यानुसार धोरणे आखली पाहिजेत.

भारताच्या निवडणूक आयोगाने अशा स्थलांतरित तरुणांसाठी, शहरी आणि ग्रामीण भागातील आपल्याघरी परत न जाता त्यांच्या मूळ ठिकाणी मतदान करण्याचे मार्ग स्वीकारले पाहिजेत.

भारतात शिक्षण, नोकरी, लग्न आणि कामासाठी तरुणांचे स्थलांतर वाढत आहे. भारताच्या निवडणूक आयोगाने अशा स्थलांतरित तरुणांसाठी, शहरी आणि ग्रामीण भागातील, घरी परत न जाता त्यांच्या मूळ ठिकाणी मतदान करण्याचे मार्ग स्वीकारले पाहिजेत. या उद्देशासाठी सरकारने आपल्या डिजिटल इंडिया उपक्रमाच्या यशाचा लाभ घेतला पाहिजे. यामुळे स्थानिक राजकारणात तरुणांपुरते मर्यादित न राहता स्थलांतरितांच्या प्रश्नांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल. डिजिटल हस्तक्षेपांव्यतिरिक्त अशा समस्यांसाठी सर्व संबंधित सामाजिक भागधारकांच्या द्विपक्षीय सहभागासह समन्वित आंतर-विभागीय पुढाकार आवश्यक आहे.

भारताने तरुणांसाठी समान संधी सुनिश्चित करून, भारताच्या लोकशाहीशी त्यांच्या उत्पादक सहभागाचा मार्ग मोकळा करणे आवश्यक आहे. अद्वितीय लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचा जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे. एक कार्यशील, दोलायमान, प्रातिनिधिक आणि समक्रमित लोकशाही म्हणून भारताची भूमिका केवळ देशांतर्गत घडामोडींमध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरही महत्त्वाची आहे. विशेषत: जेव्हा जगभरात हुकूमशाहीकडे वळण असते. शहरी भारतात अधिकाधिक तरुण मतदार नोंदणी सुनिश्चित करणे ही पहिली पायरी आहे.

स्नेहाशीष मित्रा हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनमध्ये अर्बन स्टडीजचे फेलो आहेत.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.