Published on Jan 01, 1970 Updated 0 Hours ago

राष्ट्रीय आणि राज्य विधानमंडळांमध्ये महिला आरक्षण ऐतिहासिक आहे कारण ते भारतीय राजकारणात महिलांच्या अत्यंत आवश्यक राजकीय सहभागाचा मार्ग मोकळा करते.

महिला आरक्षण कायदा: महिलांचा अधिकाधिक राजकीय सहभाग अत्यावश्यक

भारतीय संसद अलीकडेच एका ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार झाली. हा क्षण म्हणजे सप्टेंबरमध्ये झालेल्या विशेष अधिवेशनात दोन्ही सभागृहांनी बहुप्रतिक्षित महिला आरक्षण विधेयक सर्वपक्षीय सदस्यांच्या (खासदार) समर्थनासह जवळजवळ एकमताने मंजूर केले आहे. विशेष म्हणजे देशातील महिला नेत्यांनी संसदेत या विधेयकावरील चर्चेचे नेतृत्व केले. राष्ट्रपतींच्या संमतीने, महिला आरक्षण अधिकृतपणे “नारी शक्ती वंदन अधिनियम, 2023” नावाचा कायदा बनला .

जनगणना झाल्यानंतर आणि ज्या आधारावर महिलांसाठी जागा वाटप केले जाईल त्या मतदारसंघांचे सीमांकन झाल्यानंतर हा कायदा लागू होईल.

नारी शक्ती वंदन अधिनियम कायदा, म्हणजेच 106 वी घटनादुरुस्ती कायदा, ज्याअंतर्गत लोकसभा, राज्य विधानसभा आणि राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्लीच्या विधानसभेतील एकूण जागांपैकी एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव ठेवणे अनिवार्य आहे . या तरतुदीमध्ये अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) साठी लोकसभा आणि राज्यांमधील विधानसभांमध्ये राखीव असलेल्या जागांचा समावेश असेल. जनगणना झाल्यानंतर त्या आधारावर महिलांसाठी जागा वाटप केले जाईल त्या मतदारसंघांचे सीमांकन झाल्यानंतर हा कायदा लागू होईल. हे आरक्षण 15 वर्षांसाठी लागू असेल. तसेच, महिलांसाठी नियुक्त केलेल्या जागांचे वाटप संसदेने लागू केलेल्या कायद्याद्वारे प्रत्येक सीमांकनानंतर फिरवले जाईल.

ऐतिहासिक सिंहावलोकन

संविधान सभेने अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राखीव जागा दिल्या असल्या तरी, भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करताना निवडणुकीच्या राजकारणात महिलांसाठी जागा राखीव ठेवण्याची तरतूद नव्हती. भारतातील 1992 च्या 73 व्या आणि 74 व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, म्हणजे नगरपालिका स्तरावर आणि पंचायतींमध्ये महिलांसाठी किमान एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्याचा कायदा करण्यात आला. तेव्हापासून, गेल्या तीन दशकांमध्ये संसद आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी जागांच्या आरक्षणाच्या गरजेवर मोठ्या प्रमाणात विचार केला जात आहे. यापूर्वीही याबाबत कायदा करण्याचे प्रयत्न सुरू होते.

कालांतराने महिला खासदार आमदारांची टक्केवारी तुलनेने वाढली असली तरी संसदेत ती अनुक्रमे 15 टक्के आणि राज्य विधानसभेत 10 टक्क्यांच्या आसपास राहिली. गेल्या काही वर्षांमध्ये, या डोमेनमधील अनेक अभ्यास आणि अहवालांनी भारतातील राष्ट्रीय आणि राज्य-स्तरीय विधान संरचनांमध्ये महिलांसाठी जागांच्या आरक्षणाची गरज अधिक बळकट केली आहे. उदाहरणार्थ, महिला सक्षमीकरणासाठीचे राष्ट्रीय धोरण (2001) आणि भारतातील महिलांच्या स्थितीवरील अहवाल (2015) यांनी संसद आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिला आरक्षणाच्या गरजेवर भर दिला. 1996, 1998, 1999 आणि 2008 मध्ये महिलांच्या आरक्षणाची खात्री करण्यासाठी कायदा आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. 2010 मध्ये लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिला आरक्षणाचे विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले, परंतु ते होऊ शकले नाही. कारण त्याला लोकसभेची मान्यता मिळू शकली नाही.

महिला सक्षमीकरणासाठीचे राष्ट्रीय धोरण (2001) आणि भारतातील महिलांच्या स्थितीवरील अहवाल (2015) यांनी संसद आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिला आरक्षणाच्या गरजेवर भर दिला.

म्हणूनच, गेल्या काही दशकांमध्ये देशाच्या विधिमंडळ संरचनांमध्ये महिलांचा अधिक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी लोकशाही अत्यावश्यकता समजून घेण्यासाठी एकमत आणि राजकीय जागरूकता निर्माण करण्याची प्रदीर्घ प्रक्रिया पाहिली आहे. हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यामुळे, भारताच्या लोकशाही राजकीय प्रवचनासाठी कायद्याचे महत्त्व प्रतिबिंबित करणे योग्य आहे.

नुकत्याच मंजूर झालेल्या कायद्यात लोकसभेतील महिला प्रतिनिधींची संख्या 181 आणि राज्य विधानसभेतील महिला आमदारांची संख्या 2,000 पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. लोकसभा आणि विधानसभेत आतापर्यंतच्या महिला प्रतिनिधित्वाच्या तुलनेत ही लक्षणीय सुधारणा असेल. निवडणुकीचे परिदृश्य अधिक समावेशक बनतील कारण आता मोठ्या संख्येने महिला नेत्या राष्ट्रीय- आणि राज्य-स्तरावर भारताच्या विधिमंडळ राजकारणात सहभागी होतील.

इतिहास साक्षीला आहे की पुरुषसत्ताक रचनांनी स्पर्धात्मक निवडणुकीच्या राजकारणात महिला नेत्यांच्या मोठ्या सहभागाला अडथळा आणला आहे. नवीन कायद्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात तसेच विधी संस्थांमध्ये मोठ्या संख्येने महिला नेत्यांची उपस्थिती अनिवार्य होणार असल्याने, महिला राजकारण्यांसाठी अधिक अनुकूल असे राजकीय वातावरण तयार होईल. अभ्यासातून असेही दिसून आले आहे की “महिला खासदार त्यांच्या पुरुष समकक्षांच्या तुलनेत उच्च पातळीवरील प्रतिसाद, जबाबदारी, प्रामाणिकपणा आणि सहकार्याचे प्रदर्शन करतात. त्यांच्यात आरोग्य, शिक्षण, कल्याण, पर्यावरण आणि सामाजिक न्यायाशी संबंधित बाबींना प्राधान्य देण्याची प्रवृत्ती देखील असते, या सर्व गोष्टी मानवी प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण आहेत. अशाप्रकारे, महिला आमदारांच्या वाढलेल्या उपस्थितीमुळे भारतातील विधानसभेतील भाषणात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

निवडणुकीचे चित्र अधिक समावेशक असेल कारण आता मोठ्या संख्येने महिला नेत्या राष्ट्रीय आणि राज्य-स्तरावर भारताच्या विधिमंडळ राजकारणात सहभागी होतील.

73 व्या आणि 74 व्या दुरुस्ती कायद्याच्या अंमलबजावणीनंतर गेल्या तीन दशकांमध्ये स्थानिक सरकारच्या शहरी आणि ग्रामीण संरचनेत महिलांचे प्रतिनिधित्व लक्षणीयरीत्या सुधारले आहे . स्थानिक पातळीवर राखीव जागांच्या तरतुदीमुळे तळागाळातील महिलांचे योगदान उल्लेखनीयरित्या वाढले आहे. ताज्या अहवालानुसार, भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुमारे 44 टक्के जागा महिलांकडे आहेत. फ्रान्स, युनायटेड किंगडम (यूके), जर्मनी आणि जपान यांसारख्या प्रमुख देशांना मागे टाकून स्थानिक पातळीवर महिलांच्या राजकीय सशक्तीकरणाची सोय करण्यात भारत जगातील अव्वल कामगिरी करणाऱ्या राष्ट्रांपैकी एक ठरला आहे. भारताची ही सरासरी जागतिक सरासरी पेक्षा 34.3 टक्के जास्त आहे.

पुरुष राजकारण्यांकडून महिलांचा वापर कठपुतळी म्हणून केला जात असल्याची टीका आजवर होत आली आहे. मात्र अलीकडील अभ्यासातून असे दिसून आले आहे की नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांसह सार्वजनिक जीवनातील संपर्कामुळे भारताच्या स्थानिक राजकीय परिदृश्यात अनेक कार्यक्षम आणि सक्षम महिला नेत्या उदयास आल्या आहेत. स्थानिक राजकारणात महिलांच्या प्रतिनिधीत्वात सातत्याने होत असलेली सुधारणा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जागा राखून ठेवल्यामुळे महिला नेत्यांच्या राजकीय सहभागाची वाढ झाली आहे. त्यात नारी शक्ती वंदन अधिनियम कायदा लागू झाल्यानंतर राष्ट्रीय आणि राज्याच्या राजकारणात महिलांचा सहभाग आणखीन वाढणार आहे.

स्थानिक पातळीवर राखीव जागांच्या तरतुदीमुळे तळागाळातील महिलांचे राजकारणातील योगदान उल्लेखनीयरित्या वाढले आहे.

राष्ट्रीय आणि राज्य विधानमंडळांमधील महिला आरक्षणावरील हा कायदा ऐतिहासिक आहे कारण तो भारतीय राजकारणात महिलांच्या अत्यंत आवश्यक आणि बहुप्रतिक्षित मोठ्या राजकीय सहभागाचा मार्ग मोकळा करतो. राष्ट्रीय आणि राज्य विधानमंडळांमध्ये महिलांची वाढलेली उपस्थिती केवळ विधायी चर्चांमध्ये महिलांचा आवाज अधिक सुनिश्चित करत नाही तर भारताच्या संसदीय लोकशाहीच्या चौकटीत महिला नेत्यांना विविध शक्ती संस्थांमध्ये प्रवेश करण्याची एकूण संधी देखील वाढवते.

अंबर कुमार घोष हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे असोसिएट फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Ambar Kumar Ghosh

Ambar Kumar Ghosh

Ambar Kumar Ghosh is an Associate Fellow under the Political Reforms and Governance Initiative at ORF Kolkata. His primary areas of research interest include studying ...

Read More +