Expert Speak Health Express
Published on Jan 06, 2025 Updated 0 Hours ago

आफ्रिका आणि भारतातील ग्रामीण समुदायांमधील पोषण सुरक्षेच्या समस्या स्थानिक शेतकऱ्यांना सशक्त करण्यासाठी कृषी जैवविविधतेवर लक्ष केंद्रित करण्याची गरज दर्शवतात.

कृषीजैवविविधतेच्या दृष्टिकोनातून ग्रामीण आफ्रिका आणि भारतासाठी अन्न व पोषण सुरक्षा

Image Source: Getty

शेती प्रणालींमध्ये कृषिजैवविविधतेचा अभाव भारत आणि आफ्रिकेतील जवळपास 3 अब्ज लोकांच्या पोषण सुरक्षेला धोका निर्माण करतो. जेव्हा शेती प्रणालींमध्ये विविधतेचा अभाव असतो, तेव्हा त्या कीड, रोग आणि पर्यावरणीय तणावांसाठी अधिक संवेदनशील बनतात, ज्यामुळे उत्पादनात घट होते आणि पोषणमूल्य असलेल्या विविध अन्नपदार्थांची मर्यादित उपलब्धता होते. याशिवाय, एकाच प्रकारच्या पीकशेतीच्या (मोनोकल्चर) पद्धतींमुळे कालांतराने जमिनीच्या आरोग्याचे आणि परिसंस्थेच्या प्रतिकारशक्तीचे ह्रास होतो, ज्यामुळे अन्न उत्पादन आणि दीर्घकालीन अन्न सुरक्षेला आणखी तडजोड करावी लागते. कृषिजैवविविधतेच्या अभावामुळे लोकांच्या पोषणमूल्यपूर्ण आणि विविध अन्नपदार्थांच्या उपलब्धतेवर मर्यादा येते, ज्यामुळे भारत आणि आफ्रिका यांसारख्या प्रदेशांमध्ये कुपोषण वाढीस लागते.
भारतामध्ये सुमारे २२४.३ दशलक्ष लोक कुपोषित आहेत, तर आफ्रिकेमध्ये हा आकडा २७८ दशलक्ष आहे (२०२१ च्या आकडेवारीनुसार). हे धक्कादायक आकडे अन्नसुरक्षा आणि कुपोषणाशी संबंधित मूलभूत कारणांवर उपाययोजना करण्याची तातडीची गरज दर्शवतात. यासाठी कृषी जैवविविधता वाढवणे, वैविध्यपुर्ण आणि पुनरुत्पादक शेती पद्धतींचा अवलंब करणे, तसेच समाजातील सर्व घटकांना पोषणमूल्ययुक्त अन्न उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे.

कृषिजैवविविधतेच्या अभावामुळे लोकांच्या पोषणमूल्यपूर्ण आणि विविध अन्नपदार्थांच्या उपलब्धतेवर मर्यादा येते, ज्यामुळे भारत आणि आफ्रिका यांसारख्या प्रदेशांमध्ये कुपोषण वाढीस लागते.

कृषी जैवविविधता म्हणजे शेती आणि अन्न उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीवांचा विस्तृत समूह होय, जो पिढ्यानपिढ्या शेतकऱ्यांनी जोपासलेल्या परिसंस्थांच्या समृद्धी आणि टिकावूपणाचे दर्शन घडवतो.
प्रथम, कृषी जैवविविधता पोषणमूल्ये आणि आहारातील विविधतेचा समृद्ध स्रोत प्रदान करते. पारंपरिक पिके आणि स्थानिक वाणांचा पोषणमूल्याच्या दृष्टीने व्यावसायिक एकपिकीय पिकांपेक्षा जास्त फायदा होतो. उदाहरणार्थ, भारत आणि आफ्रिकेमधील स्थानिक प्रकारची नाचणी, ज्वारी आणि कडधान्ये प्रतिकूल पर्यावरणीय परिस्थितींशी अधिक तग धरणारी असतात आणि त्यामध्ये लोह, झिंक आणि कॅल्शियम यांसारख्या आवश्यक पोषकतत्वांचे प्रमाण जास्त असते. या विविध पिकांची लागवड आणि सेवनास प्रोत्साहन दिल्यास ग्रामीण समुदाय कुपोषणावर मात करू शकतात आणि त्यांना चांगले आरोग्य लाभू शकते.
दुसरे म्हणजे, कृषी जैवविविधता परिसंस्थेच्या तग धरण्याच्या क्षमतेत आणि शाश्वततेत योगदान देते. विविध शेती प्रणाली कीड, रोग आणि हवामानातील बदलांसाठी अधिक तग धरणारी असते आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देते.
तसेच, कृषी जैवविविधता सांस्कृतिक आणि पारंपरिक ज्ञानाच्या भांडारास सहाय्य करते. या परंपरांमध्ये स्थानिक परिस्थितींशी सुसंगत असलेल्या विविध पिकांची लागवड आणि स्थानिक शेती पद्धतींचा समावेश असतो. या पारंपरिक ज्ञानाच्या भांडाराचे जतन केल्यास आणि प्रोत्साहन दिल्यास ग्रामीण समुदाय बाहेरून येणाऱ्या संकटात अधिक तग धरू शकतात आणि आपली सांस्कृतिक ओळखही टिकवून ठेवू शकतात.

टांझानियातील कॉफी शेतकऱ्यांसाठी अन्न आणि पोषण सुरक्षा वृद्धिंगत करणे 

टांझानियामध्ये सुमारे 20 टक्के कुटुंबांना "पुरेश्या कॅलरीज असलेला आहार" खरेदी करणे शक्य होत नाही, आणि ५० टक्क्यांहून अधिक कुटुंबांना "पोषक आहार" घेणे शक्य होत नाही.
टांझानियाच्या दक्षिणी उंच पर्वतीय भागात, ज्या भागात कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे, स्थानिक उपलब्ध पोषणमूल्ययुक्त अन्नाच्या उत्पादन आणि सेवनावर लक्ष केंद्रित करणाऱ्या कृषी जैवविविधतेवर आधारित कार्यांनी २२,५०० पेक्षा जास्त लहान कॉफी उत्पादक शेतकऱ्यांचा पोषण स्तर आणि उत्पन्न सुधारले आहे. "पासपोर्ट टू कॉफी एक्सपोर्ट" कार्यक्रमाच्या केंद्रात असलेल्या शेतकऱ्यांना शेतकरी शाळा आणि प्रात्यक्षिक क्षेत्रांद्वारे सहाय्य केले गेले आहे, ज्यात आंतरपिके, पिकांची फेरी, मातीचे आरोग्य व्यवस्थापन, कृषी वनीकरण, एकत्रित कुक्कुटपालन-शेती प्रणाली आणि पिकांची विविधता यांसारख्या पद्धतींचा समावेश आहे.

समुदायातील महिलांनी भाजीपाल्यांची लागवड केली आहे ज्याचा पोषणमूल्ययुक्त घरगुती अन्न म्हणूनही आणि स्थानिक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होते.

शेतकरी आता अवोकाडो आणि केळीसारखी फळझाडे लावतात, जी कॉफीच्या झुडपांना थेट सूर्यप्रकाशापासून संरक्षण देतात आणि आर्द्रता जतन करतात. कडधान्ये, जी कव्हर क्रॉप्स म्हणून वापरली जातात, त्यासोबतच कुटुंबांसाठी पोषणयुक्त अन्नाचा स्रोत म्हणून काम करतात. मधमाशी पालनही शेतकऱ्यांकडून केले जाते, जे शेतात परागीकरणास मदत करते, जैवविविधता टिकवून ठेवते आणि मधाची विक्री करून शेतीतून मिळणाऱ्या विविध उत्पन्नास मदत करते.
तसेच, समुदायातील महिलांनी भाजीपाल्याची लागवड केली आहे ज्याचा पोषणमूल्ययुक्त घरगुती अन्न म्हणूनही आणि स्थानिक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होते. कुक्कुटपालन आणि पशुपालनाने पोषणयुक्त अन्नाच्या उपलब्धतेत सुधारणा झाली आहे, तसेच मातीच्या आरोग्याच्या दृष्टीने (शेतातील खतामुळे) फायदेशीर ठरले आहे आणि कुटुंबांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत प्रदान केला आहे.

मध्य भारतातील शेतीमध्ये पोषण सुरक्षेचा समावेश

२०१६ पासून, भारतातील शाश्वत सोया कार्यक्रम मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील १,६०,००० लहान शेतकऱ्यांसोबत काम करत आहे, ज्याचा उद्देश शेती व शेतमालाच्या कमी होत असलेल्या उत्पादन क्षमतेचे विवेचन करणे, सोयाबीन मूल्य साखळीला टिकाऊ आणि समावेशक बनवणे, आणि ग्रामीण समुदायांची अन्न आणि पोषण सुरक्षा सुनिश्चित करणे आहे.
या भागांमध्ये, कृषी जैवविविधतेच्या दृष्टिकोनाने शेतकऱ्यांना उच्च उत्पादन देणाऱ्या कीड प्रतिकारक आणि हवामान-स्मार्ट बियाण्यांच्या वाणांची ओळख करून दिली, तसेच पुनरुत्पादक शेती पद्धती जसे की पिकांची विविधता (कडधान्ये, भाजीपाला आणि औषधी वनस्पतींसह), आंतरपिके, जैव-आधारित कीटकनाशक/खते, प्रभावी पाणी व्यवस्थापन, मातीच्या आरोग्याचे संवर्धन/सुधारणा आणि पोषण व्यवस्थापन यांचा अवलंब केला. सुमारे १,००,५३० हेक्टर जमीन आता शाश्वत व्यवस्थापनाखाली आहे (त्यात चराई क्षेत्र समाविष्ट आहे), आणि १८,८२५ शेतकऱ्यांनी विविध पिकांमध्ये बदल केला आहे. याशिवाय, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT)-आधारित उपकरणे शेतकऱ्यांना त्यांच्या फोनवर स्थानिक हवामान सूचना प्रदान करतात, ज्यामुळे त्यांना प्रभावीपणे शेती करण्यास मदत होते आणि पिकांच्या नुकसानीची तपासणी करता येते.

मध्य प्रदेशातील पाच ग्रामीण जिल्ह्यांमध्ये, जिथे कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे तिथे शेतकऱ्यांना जनजागृती मोहिमा आणि प्रशिक्षणाद्वारे पोषण बागांची लागवड करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते, जे कुटुंबासाठी आहारातील विविधता सुनिश्चित करण्यासोबतच अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत देखील प्रदान करतात.

मध्य प्रदेशातील पाच ग्रामीण जिल्ह्यांमध्ये, जिथे कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे तिथे शेतकऱ्यांना जनजागृती मोहिमा आणि प्रशिक्षणाद्वारे पोषण बागांची लागवड करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते, जे कुटुंबासाठी आहारातील विविधता सुनिश्चित करण्यासोबतच अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत देखील प्रदान करतात. या कार्यक्रमातील बदलाच्या मुख्य प्रवर्तक या महिला आहेत. त्यांना समुदाय संपर्ककर्ता (मुख्य शेतकरी) आणि न्यूट्री सखी (पोषण नायक) होण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते, जे नंतर इतर महिलांना स्थानिक उपलब्ध पोषणयुक्त अन्न जसे की प्रथिनांनी समृद्ध असलेली सोयाबीन सेवन करण्याचे महत्त्व समजावतात. यामुळे महिला समुदायांमध्ये सामाजिक आणि वर्तनात्मक बदलाच्या प्रवर्तक होत आहेत.

स्वीकृतीतील आव्हाने आणि पुढील वाटचाल

कृषी जैवविविधतेसमोर विविध आव्हाने आहेत, जसे की औद्योगिक शेतीचा विस्तार, जमिनीचे ऱ्हास, पारंपरिक ज्ञानाचा ऱ्हास आणि हवामान बदल यामुळे उद्भवणारे मोठे धोके. धोरणात्मक आराखडे अनेकदा एकपिकीय शेती आणि जास्त संसाधन लागणाऱ्या शेती पद्धतींना प्राधान्य देतात, ज्यामुळे ग्रामीण समुदायांच्या अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी महत्त्वपुर्ण असणाऱ्या कृषी जैवविविधतेकडे दुर्लक्षित होते.
केस स्टडीमधून प्राप्त पुराव्यांच्या आधारे, भारत आणि आफ्रिकेतील धोरणकर्त्यांना विचार करण्यासाठी काही महत्त्वाच्या शिफारसी पुढीलप्रमाणे आहेत:
  • ऍग्रोइकॉलॉजी झोन्सनुसार कृषी जैवविविधतेचे आराखडे विकसित करा, ज्यामध्ये शेतकरी, कृषी संस्थांची मंडळे आणि संघटना तसेच स्थानिक परिस्थिती आणि गरजांनुसार कृषी उपाययोजना तयार करण्यासाठी व राबविण्यासाठी तज्ज्ञांचा सक्रिय सहभाग असावा.
  • शेतीमधील महिलांची महत्त्वपूर्ण भूमिका ओळखा आणि महिला शेतकऱ्यांना प्रशिक्षण साधने आणि नेतृत्वाच्या भूमिका उपलब्ध करून द्या, जेणेकरून त्यांचा कृषी जैवविविधता उपक्रमांमधील सहभाग वाढू शकेल.
  • शेतकऱ्यांना कृषी जैवविविधता पद्धती (जसे की पुनरुत्पादक शेती) प्रभावीपणे लागू करण्यासाठी आवश्यक कौशल्ये, माहितीचे आदान प्रदान आणि प्रशिक्षण कार्यक्रम सुलभ करा. यामध्ये शेतकरी शाळा, प्रात्यक्षिक क्षेत्रे, कृषी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली क्षमता निर्माण करणाऱ्या कार्यशाळा आणि स्थानिक विस्तार सेवा यांचा समावेश आहे.
  • कृषी विस्तार सेवांमध्ये आणि सामूहिक संपर्क कार्यक्रमांमध्ये पोषण शिक्षण समाविष्ट करा. शेतकऱ्यांना सुधारित परिणामांसाठी विविध आहारांच्या महत्त्वाची माहिती द्या. पोषणतज्ञ आणि आरोग्य तज्ञांसोबत सहकार्य करून विशेषत: तयार केलेली शैक्षणिक सामग्री आणि संदेश विकसित करा.

कृतिका बॅनर्जी या सॉलिडारिडाड एशियाच्या वरिष्ठ संपादक आहेत.

शोबा सुरी या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या हेल्थ इनिशिएटिव्हचे वरिष्ठ फेलो आहेत.

गॉडलव्ह नेडरिंगो हे सॉलिडारिडाड येथे, टांझानियाचे वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक आहेत.

सुरेश मोटवानी हे सॉलिडारिडाड येथे, भारताचे महाव्यवस्थापक आहेत.

प्रशांत पास्टोरे हे सॉलिडारिडाड येथे, पाणी महाव्यवस्थापक आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Authors

Kritika Banerjee

Kritika Banerjee

Kritika Banerjee leads communications for Solidaridad Asia. She has more than 14 years of experience as a writer-editor across print and digital publications including The ...

Read More +
Shoba Suri

Shoba Suri

Dr. Shoba Suri is a Senior Fellow with ORFs Health Initiative. Shoba is a nutritionist with experience in community and clinical research. She has worked on nutrition, ...

Read More +
Godlove Nderingo

Godlove Nderingo

Godlove Nderingo is Senior Project Manager with Solidaridad East and Central Africa. At Solidaridad, Godlove is driving market access for smallholder-crafted sustainable tea, coffee and ...

Read More +
Suresh Motwani

Suresh Motwani

Dr. Suresh Motwani is General Manager with Solidaridad Asia. He has over 20 years of experience in driving sustainability in agricultural supply chains. At Solidaridad, ...

Read More +
Prashant Pastore

Prashant Pastore

Prashant Pastore is Head - Water & Sustainable Agriculture Programmes at Solidaridad Asia. He has over 20 years of experience in programme management, training, and ...

Read More +