Author : Snehashish Mitra

Published on Nov 20, 2023 Commentaries 0 Hours ago

भारतीय शहरांमधील खेळांमध्ये अस्ट्रोटर्फच्या वापराचा पुनर्विचार आवश्यक

भारतीय शहरांमधील खेळांमध्ये अस्ट्रोटर्फच्या वापराचा पुनर्विचार आवश्यक

2000 च्या दशकाच्या सुरुवातीपासूनच्या काळात अस्ट्रोटर्फ क्रीडा मैदाने भारतातील शहरांमध्ये पसरलेली दिसत आहे. या संदर्भातील अभ्यासकांनी अलीकडे असे सुचवले आहे की अस्ट्रोटर्फचे आरोग्य विषयक अनेक परिणाम पाहायला मिळत आहेत. ज्यामुळे नेदरलँड सह अनेक युरोपीय देशांमध्ये अस्ट्रोटर्फची जागा घेण्यात आली आहे. जिथे अस्ट्रोटर्फ चा वापर क्रीडा क्रियाकलापांसाठी (प्रामुख्याने फुटबॉल) करण्यात आला. अनेक भारतीय शहरांनी व्यावसायिक क्षमतांमध्ये अस्ट्रोटर्फ-आधारित क्रीडा सुविधा विकसित केल्या असल्याचे दिसते. शहरी नियोजकांनी क्रीडा क्रियाकलापांसाठी चांगल्या प्रकारे राखल्या गेलेल्या आणि लोकांसाठी प्रवेशयोग्य असलेल्या हिरव्या जागा वाढवण्यासाठी हस्तक्षेप तयार करताना अस्ट्रोटर्फ च्या वापराचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. शहरामध्ये असलेल्या क्रीडा परिस्थितीचा भारताच्या क्रीडाविषयक उद्दिष्टांवर नक्कीच महत्त्वपूर्ण परिणाम होत असतो.

भारताचे खेळांमध्ये लक्ष केंद्रित करून धोरणावर भर

मैदानी खेळ तसेच खेळांच्या विविध सरावांचा मानवी मन शरीर आणि आत्मा यांच्या सर्वांगीण विकासाशी जवळचा संबंध आहे. भारताचे प्रख्यात अध्यात्मिक नेते स्वामी विवेकानंद यांनी एकदा भाष्य केले होते की, फुटबॉल खेळणे हे भारतातील तरुणांसाठी भगवद्गीता वाचण्याइतकेच महत्त्वाचे आहे. आध्यात्मिक कल्याण मिळविण्यासाठी चांगल्या शारीरिक आरोग्याच्या महत्त्वावर त्यांनी जोर दिला होता. आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रामध्ये अलीकडच्या वर्षात भारताची कामगिरी सुधारली आहे. क्रिकेटच्या क्षेत्रात देखील भारताने एक मोठा दर्जा राखलेला आहे. 2020 च्या ऑलम्पिक मध्ये भारताने टोकियो येथे झालेल्या स्पर्धेत सात पदती जिंकून चार दशकातील सर्वोत्तम खेळाचा परिणाम साधला आहे. याबरोबरच 2023 मध्ये हँगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 107 पदकांची विविध स्पर्धांमध्ये जिंकून आतापर्यंतची सर्वोत्तम पदक तालिका नोंदवलेली आहे. याशिवाय 2020 मध्ये टोकियो येथे झालेल्या पॅरालिंपिक गेम मध्ये भारताने सर्वोच्च पदक मिळविलेले आहे.

भारतातील अनेक शहरांनी व्यावसायिक क्षमतांचा विकास करत असताना अस्ट्रोटर्फ आधारित अनेक क्रीडा सुविधा विकसित केल्या आहेत. त्यामुळे शहरातील नियोजकांनी क्रीडा क्रिया कलापासाठी चांगल्या प्रकारे राखण्यात आलेल्या आणि लोकांसाठी प्रवेश योग्य असलेल्या हिरव्या जागा वाढविण्यासाठी हस्तक्षेप तयार करत असताना अस्ट्रोटर्फ च्या वापराचे मूल्यांकन करणे अत्यावश्यक झाले आहे.

भारताच्या क्रीडा धोरणाला आकार देण्याच्या दिशेने भारत सरकारने सक्रिय भूमिका घेतली आहे: राजीव गांधी खेल अभियान (RGKA), अर्बन स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम (USIS) आणि राष्ट्रीय क्रीडा प्रतिभा योजना (NSTS) या पूर्वीच्या योजना एकत्र करून ‘खेलो इंडिया’ ही योजना तयार करण्यात आली होती. खेलो इंडिया योजना ही युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाची प्रमुख केंद्रीय क्षेत्र योजना आहे. जी 12 अनुलंबांच्या संयोजनाद्वारे एक मजबूत सॉफ्ट पॉवर स्थिती प्राप्त करण्याचे साधन म्हणून खेळाचा लाभ घेण्याची कल्पना करण्यात आली आहे.  त्यापैकी काही प्रतिभा शोध आणि विकास, राज्य- स्तरावरील खेलो इंडिया केंद्रे, मैदानी विकास, महिलांसाठी खेळ, शांतता आणि विकासासाठी खेळ याचा अवलंब करण्यात आला आहे. अलिकडच्या काळात, भारताने 2017 मधील फिफा अंडर-17 फुटबॉल विश्वचषक सारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. 2036 मध्ये ऑलिम्पिकचे आयोजन करण्यासाठी बोली देखील लावण्यात आली आहे. अशा प्रकारचे यश आणि प्रमुख क्रीडा स्पर्धा नियमितपणे आयोजित करण्याच्या महत्त्वाकांक्षा भारतातील शहरे आणि खेड्यांमध्ये सर्वांगीण क्रीडा वातावरणासह पूरक असणे आवश्यक आहे. ज्यामध्ये युवकांना क्रीडा आणि शारीरिक क्रियाकलापांमध्ये सामील करून घेतले जाईल.

कमी होणारी शहरातील खेळाची मैदाने आणि अस्ट्रोटर्फचा पर्याय

भारतामध्ये होणाऱ्या बहुतेक प्रमुख क्रीडा स्पर्धा या मोठ्या शहरांमध्ये होत असताना भारतीय शहरांमध्ये खेळाची मैदानांची संख्या कमी होत आहे. ज्यामुळे अलीकडच्या काही वर्षात भारतामध्ये मजबूत शहरी क्रीडा संस्कृतीचा विकास खुंटला आहे असे म्हणावे लागेल. अनेक शहरांमध्ये सुशोभीकरण प्रकल्प, रिअल इस्टेट आणि पार्किंगच्या उद्देशाने क्रीडांगणांचा पुनर्विकास करण्यात आला आहे. परिणामी मुलांचे सेंद्रिय एकत्र येणे आणि शहरांमधील क्रीडा स्पर्धांमध्ये मोठी घट झाली आहे. या क्षेत्रातील तज्ञांचे असे मत आहे की, शहरी मध्यमवर्ग क्रिकेट हा खेळ वगळता अन्य खेळांपासून मोठ्या प्रमाणात दूर गेलेला आहे.

अनेक शहरांमध्ये सुशोभीकरण प्रकल्प, रिअल इस्टेट आणि पार्किंगच्या उद्देशाने क्रीडांगणांचा पुनर्विकास करण्यात आला आहे.

भारतातील बहुतांश शहरांमध्ये क्रीडांगणाची घट होण्याबरोबरच व्यावसायिक अस्ट्रोटर्फ मध्ये वाढ झालेली दिसत आहे. अनेक विपुल क्रीडा स्थळांनी देखील अस्ट्रोटर्फ चा पर्याय स्वीकारलेला दिसत आहे.  2007 मध्ये भारताचे प्रमुख फुटबॉल मैदान विवेकानंद युवा भारती क्रीडांगन (VYBK), कोलकाता (सामान्यत: सॉल्टलेक स्टेडियम म्हणून ओळखले जाते) यांनी गवताची खेळपट्टी बदलून त्या ठिकाणी अस्ट्रोटर्फ तयार केले आहे. 2010 मध्ये, मुंबईतील वाशी येथील फादर अॅग्नेस स्कूल ही त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा क्रियाकलापांना चालना देण्यासाठी अस्ट्रोटर्फमध्ये गुंतवणूक करणारी भारतातील पहिली शाळा ठरली आहे. गेल्या काही वर्षांत दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, कोलकाता आणि हैदराबाद यांसारख्या अनेक शहरांमध्ये अस्ट्रोटर्फ-आधारित व्यावसायिक क्रीडा मैदाने तयार झाली आहेत.  ही मैदाने क्रिकेट आणि फुटबॉल खेळण्यास इच्छुक असलेल्या लोकांच्या गटांना भाड्याने दिली जात आहेत. असे उपक्रम शहरवासीयांमध्ये लोकप्रिय आहेत. मेट्रो शहरांमध्ये जिथे मोठ्या संख्येने तरुण इतर ठिकाणांहून स्थलांतरित होतात, क्रीडा गट उदयास आले आहेत जे त्यांच्या प्रसार आणि जाहिरातींद्वारे अस्ट्रोटर्फवर खेळण्यास इच्छुक असलेल्या लोकांना एकत्र आणतात. जे नंतर लोकांना समाजीकरणासाठी जागा उपलब्ध करून द्या तसेच अस्ट्रोटर्फ हवामानास प्रतिरोध असणे सम खेळपट्टी असणे त्याचे कालबद्ध असलेले स्लॉट त्याबरोबरच इतर संबंधित क्रीडा सुविधामुळे अस्ट्रोटर्फची लोकप्रियता वाढलेली आहे. या ठिकाणी महत्त्वाचे म्हणजे विविध विकास उपक्रमामुळे (जसे की पायाभूत सुविधा आणि रियल इस्टेट) भारतीय शहरांमधील कमी होत चाललेली हिरवीगार जागा अनेक शहरी क्रीडा प्रेमींसाठी अस्ट्रोटर्फ हा एक उपयुक्त पर्याय म्हणून समोर आलेला आहे.

अस्ट्रोटर्फपासून आरोग्याच्या धोक्यांचा विचार

अस्ट्रोटर्फच्या संदर्भात केलेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की त्याच्या कृत्रिम हिरवाईमुळे मानवी आरोग्यासाठी संभाव्य धोके निर्माण झालेले आहेत. हे आजूबाजूच्या वातावरणासाठी हानिकारक देखील आहेत. अस्ट्रोटर्फ च्या मुख्य घटकांपैकी एक असलेल्या म्हणजे ग्रॅन्युलेट्स ज्याचा वापर इन्फिल म्हणून केला जातो; अशा ग्रॅन्युलेट्सची निर्मिती शेवटचे टायर, ऍथलेटिक शूजचे तळवे, सिलिका वाळू आणि/किंवा नवीन थर्माप्लास्टिक किंवा रबर सामग्रीवर प्रक्रिया करून केली जाते. परिणामी  अस्ट्रोटर्फमध्ये जस्त, शिसे, आर्सेनिक आणि कॅडमियम सारख्या अनेक विषारी धातू असतात.  जे मानवांसाठी आरोग्यासाठी धोकादायक असतात. नैसर्गिक ग्राउंड्सच्या विपरीत अस्ट्रोटर्फ वनस्पती आणि प्राण्यांसाठी कोणत्याही नैसर्गिक अधिवासाला समर्थन देत नाहीत. त्यामुळे त्यांचा अधिवास नष्ट होतो. याव्यतिरिक्त, अस्ट्रोटर्फ नैसर्गिक जमिनीपेक्षा जास्त गरम होण्याची शक्यता असते, ज्यामुळे नंतर उष्णतेचे प्रमाण वाढवण्याची शक्यता अधिक होते – शहरी क्षेत्र जे दूरच्या भागांपेक्षा जास्त तापमान अनुभवतात, हे त्याचे एक कारण म्हणता येईल.  बहुतेक भारतीय शहरे आधीच उच्च उष्णता आणि आर्द्रतेने त्रस्त आहेत हे लक्षात घेता, पुढील अस्ट्रोटर्फ क्रीडा उपक्रमांवर तात्काळ थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. अस्ट्रोटर्फच्या उच्च उष्णतेमुळे खेळाडूंना जळजळ, थकवा आणि निर्जलीकरण देखील होते. अनेक प्रसंगी, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनी अस्ट्रोटर्फबद्दल नाराजी नोंदवली आहे. जगभरातील अनेक नगर परिषदांनी अस्ट्रोटर्फवर बंदी घातली आहे. गवत खेळण्याचे मैदान पुनर्संचयित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ज्या ठिकाणी म्हणजे नेदरलँड मध्ये अस्ट्रोटर्फला अधिक लोकप्रियता मिळाली होती तेथील फुटबॉल क्लब ने 2025/2026 या हंगामापासून प्लास्टिकच्या खेळपट्ट्यांवर बंदी घालण्याचे वचन दिलेले आहे.

नैसर्गिक जमिनीपेक्षा अस्ट्रोटर्फ गरम होण्याची जास्त शक्यता असल्यामुळे तसेच त्यातून अधिक उष्णता निर्माण होत असल्याने शहरी क्षेत्रांमध्ये जास्त तापमानाचा अनुभव येत आहे.

या सर्व घडामोडी लक्षात घेता भारताने क्रीडा क्षेत्रामध्ये अस्ट्रोटर्फ च्या प्रचलित वापरावर पुनर्विचार नक्कीच करायला हवा. विदेशातील अस्ट्रोटर्फ वरील संशोधनाचे संकेत लक्षात घेऊन इतर ठिकाणाहून देखील शासनाने धडे घेतले पाहिजेत. भारताने अस्ट्रोटर्फच्या परिणामाबद्दल स्वतःचा स्वतंत्र अभ्यास देखील करायला हवा, हा अभ्यास नंतर क्रीडा क्षेत्रामध्ये आणखी धोरणात्मक निर्णय घेण्यास एक प्रकारे समर्थन देईल. अस्ट्रोटर्फ च्या संदर्भातील चर्चेतून समोर आलेली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, शहरी नियोजनाने समाजासाठी हिरव्या मोकळ्या जागांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जे शहरी तरुणांसाठी क्रीडा क्रियाकलापांना प्रोत्साहन देण्याव्यतिरिक्त, समुदायाच्या सहभागासाठी जागा देखील प्रदान करते. मोकळ्या जागा वाढवण्याचा प्रयत्न करताना शहरांमधील सध्याची क्रीडांगणे टिकवून ठेवण्यासाठी व्यावसायिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी जमिनीचे कठोर सीमांकन लागू करणे आवश्यक आहे. नियोजकांनी चंदीगड (पंजाब आणि हरियाणा) आणि सॉल्टलेक (पश्चिम बंगाल) सारख्या मोकळ्या जागांचा समावेश असलेल्या काही यशस्वी शहरी नियोजनातून एक संकेत घेणे आवश्यक आहे. सरकारच्या संबंधित क्रीडा एजन्सींना आणि धोरण फ्रेमवर्क (खेलो इंडिया सारख्या) यांना शहरी नियोजन, विकास आणि परिवर्तनामध्ये भूमिका मांडण्यासाठी सक्षम करणे, भारतीय शहरांमधील हरित क्रीडांगणांची भागीदारी वाढवण्यासाठी विचार केला जाऊ शकतो. या ठिकाणी हे सुनिश्चित केले जाईल की शहरी युवकांना खेळांमध्ये त्यांची प्रतिभा व्यक्त करण्याचा निश्चित मार्ग सापडेल. त्यांचे मानसिक, शारीरिक आरोग्य विकसित केली जाईल. ज्यामुळे मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची सातत्यपूर्ण विश्वासार्ह कामगिरी अधिक उंचावू शकणार आहे.

स्नेहाशीष मित्रा हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनमध्ये अर्बन स्टडीजचे फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.