-
CENTRES
Progammes & Centres
Location
दरवर्षी 7 जून आपण जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून साजरा करत असतो. यानिमित्ताने अन्न साखळीत लपलेल्या अदृश्य धोक्यांकडे लक्ष वेधले आहे. ‘अन्न सुरक्षा : कृतीद्वारे विज्ञान’ ही यावर्षीची संकल्पना आहे. यामध्ये कोणत्या गोष्टी अन्नाला सुरक्षित बनवतात एवढेच महत्त्वाचे नाही तर ती प्रक्रिया काय आहे, कोणती साधने वापरली जावीत हेही महत्त्वाचे आहे.
याची उत्तरे शेतातच दडली आहेत. यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन, विक्रेत्यांचे नियमपालन आणि स्वयंपाकघरातली पद्धत लक्षात घ्यायला हवी. बायोसेन्सर प्रयोगशाळांचाही याच्याशी तितकाच संबंध आहे. प्रदूषणाविरुद्धची लढाई, पारदर्शकतेसाठी आग्रह आणि हवामान-अनुकूल अन्न प्रणालींसाठी दीर्घ लढ्याची गरज आहे.
ही मालिका भारताच्या अन्न सुरक्षा परिसंस्थेतील जोखीम आणि लवचिकतेच्या बाबींवर प्रकाश टाकते. याची सुरुवात कृषी पर्यावरणशास्त्र आणि जमीन हक्कांपासून होते. शेतीची मालकी आणि शाश्वततेचा अन्नसुरक्षेशी संबंध आहे. सांडपाण्याचा पुनर्वापर आणि हवामानाची स्थिती यांचाही विचार करावा लागेल. अन्न सुरक्षेमध्ये अर्थशास्त्राचाही अंतर्भाव आहे. जपानमध्ये AI ची मदत घेऊन यावर संशोधन होत आहे. क्लाउड किचन, प्रक्रिया केलेले अन्न, स्वयंपाकाच्या तेलाचा पुनर्वापर अशा गोष्टींचाही यात समावेश होतो. अन्नपदार्थांचे अनौपचारिक विक्रेतेही अन्नसुरक्षा अडचणींमध्ये भर घालतात. त्यामुळे सातत्याने, समानतेने आणि शेवटपर्यंत काम करणे महत्त्वाचे ठरते. ही मालिका भारताच्या पुरवठा साखळीतील प्रत्येक दुवा तसेच शेतीपासून ते ताटापर्यंत अन्नाचे रक्षण करणाऱ्या एकात्मिक आणि वैज्ञानिक उपायांवर भर देते.
वापरलेले स्वयंपाकाचे तेल ही भारताच्या अन्नसुरक्षेतील मोठी समस्या आहे. त्यावर उपाय काढण्यासाठी वैज्ञानिक कृतींची अंमलबजावणी आणि जनजागृतीद्वारे अन्न सुरक्षा, सार्वजनिक आरोग्य आणि जैवइंधन धोरणात समन्वय साधण्याची आवश्यकता आहे. ...
देशातील गर्दीच्या स्ट्रीट फूड संस्कृतीकडून लाखो नागरिकांची अन्नाची गरज भागत आहे; परंतु अंमलबजावणीतील त्रुटी आणि अल्प गुंतवणुकीमुळे अन्न सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ही परंपरा आणि नियमन यांच्यातील ...
हवामान बदलामुळे भारतातील अन्नसुरक्षेच्या जोखमींचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे, आणि त्यामुळे हवामानविषयक डेटाचा समावेश नियामक आराखड्यांमध्ये तातडीने करणे अत्यावश्यक ठरत आहे. ...