-
CENTRES
Progammes & Centres
Location
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी कट्टरतावाद्यांनी घडवलेल्या क्रूर हल्ल्याने भारत आणि पाकिस्तानातील तणाव अभूतपूर्व पातळीवर पोहोचला. या हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आणि भारताने ठोस पावले उचलण्याचा निर्धार केला. यातूनच जन्म झाला ‘ऑपरेशन सिंदूर’चा, ज्याअंतर्गत भारताने 7 मे 2025 रोजी पहाटे पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले करून 100 हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. भारताने स्पष्ट केले की, ही कारवाई फक्त दहशतवादी तळांपुरती मर्यादित होती. मात्र, या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून 8 आणि 9 मे रोजी पाकिस्तानने ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न केला, जे भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने यशस्वीपणे हाणून पाडले. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही केवळ एक लष्करी कारवाई नसून, दहशतवादाविरुद्ध भारताच्या दृढनिश्चयाचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. या मालिकेत आपण या ऑपरेशनच्या प्रत्येक पैलूचा सखोल अभ्यास करणार आहोत.
ऑपरेशन सिंदूरने हे सिद्ध केले की पाकिस्तानपेक्षा भारताची गुप्तचर यंत्रणा सक्षम आहे. ही आघाडी टिकवण्यासाठी भारताने आता अधिक सखोल प्रादेशिक भागीदारी, प्रचारविरोधी डावपेच रणनीती आणि गुप्त कारवायांची गरज आहे. ...
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना पराभवाच्या काळातही पदोनन्ती मिळाल्यामुळे त्यांची देशावरची पकड अधिक घटट् होऊ शकते. यामुळे पाकिस्तान मात्र आर्थिक संकटात, प्रादेशिक अशांततेत आणि अनियंत्रित लष्करशाहीकडे ओढला जातो आहे. ...
काश्मीरबाबत भारत आणि पाकिस्तानमधील मध्यस्थी करण्याच्या ट्रम्प यांच्या प्रयत्नावर भारत सरकारने नाराजी व्यक्त केली. या हस्तक्षेपातून त्यांच्या मुत्सद्दी क्षमतेपेक्षा भ्रमित विचारसरणीचे दर्शन घडतं. अमेरिकेने मध्यस्थी करण्याचा विचार करणं हे वास्तव ...
सायबर ऑपरेशन्स आणि मानसिक युद्ध यांची सीमारेषा आता अस्पष्ट होत चालली आहे. अशा स्थितीत, भारताने केवळ तांत्रिक यंत्रणाच नाही, तर नरेटिव्ह, लोकांचं आकलन आणि सार्वजनिक विश्वास या सर्व पातळ्यांवरही लवचिकता ...
भारताच्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानच्या आण्विक धूळफेकीला उघडे पाडले आहे आणि संबंधांचे नवे नियम घालून देऊन एक स्पष्ट धोकाही दाखवून दिला आहे. तो म्हणजे, दहशतवादासाठी कधीही द्यावी लागली नाही, ती जबर ...
पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने गेल्या आठवड्यात 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले, जे शनिवारी शस्त्रसंधीने संपले. मात्र, पाकिस्तानने आपला खोडसाळपणा थांबवला नाही आणि शनिवारी संध्याकाळीही काही ठिकाणी हल्ले झाले, ज्याला भारताने ...