Author : Oommen C. Kurian

Expert Speak Health Express
Published on Nov 13, 2025 Updated 21 Hours ago

भारताने कालांतराने वार्षिक कुष्ठरोगाचे प्रमाण कमी करण्यात यश मिळवले आहे, परंतु वंचित समुदाय अजूनही असमान भार सहन करत आहेत. त्यामुळे वरवरच्या प्रगतीखाली दडलेली मोठी तफावत स्पष्ट दिसून येते.

कुष्ठरोगमुक्त भारताची वाटचाल: आकड्यांआड दडलेली विषमता

Image Source: Getty Images

    जगातून कुष्ठरोग पूर्णपणे नाहीसा झालेला नाही आणि अजूनही सर्वाधिक रुग्णांचा भार भारतावर आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) ताज्या अहवालानुसार जगभरात नवीन आढळलेल्या रुग्णांची संख्या 1,82,815 होती. यापैकी भारताने 1,07,851 प्रकरणे नोंदवली, म्हणजेच जगातील नवीन प्रकरणांपैकी 59 टक्के. दोन दशकांपूर्वी 2004 मध्ये जगभरातील नवीन रुग्णसंख्या 4,51,325 इतकी होती. मात्र त्यावेळी भारताचा वाटा आणखी मोठा होता, 81 टक्क्यांपेक्षा जास्त, म्हणजेच 367,143 प्रकरणे. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीपासून भारतात व जगात परिस्थिती सुधारली असली तरीही मोठ्या सामाजिक व आर्थिक प्रगतीनंतरदेखील भारताचा जागतिक प्रमाणात मोठा व कायमस्वरूपी वाटा आहे.

    भारत सरकारच्या 2018 मधील आदिवासी आरोग्यावरील तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार, लोकसंख्येतील वाटा तुलनेने खूपच कमी असूनही अनुसूचित जमातींनी 2015–16 मध्ये देशातील एकूण कुष्ठरोग रुग्णांपैकी जवळपास 18.79 टक्के हिस्सा घेतला. 2018 ते 2019 दरम्यान ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनने प्रकाशित केलेल्या विश्लेषणात सरकारच्या 2008- 09 ते 2016-17 या कालावधीतील आकडेवारीचा अभ्यास केला आणि स्पष्ट केले की कुष्ठरोग हा वाढत्या प्रमाणात वंचितांचा आजार बनत चालला आहे, विशेषतः अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यामध्ये, तसेच राज्यनिहाय असमानता देखील ठळकपणे दिसते.

    राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या (NLEP) जुन्या संकेतस्थळावर राज्यनिहाय विभाजित आकडेवारी सहज डाउनलोड करता येत होती. ही माहिती 2019 च्या अखेरपर्यंत अनेक अभ्यासांमध्ये वापरली केली गेली, पण नंतर ती संकेतस्थळावरून हटवली गेली.

    ही तपासणी शैक्षणिक क्षेत्र, सामाजिक संस्था आणि वैद्यकीय तज्ज्ञ यांना पटली आणि पुढे मोठ्या प्रमाणात वापरली गेली. 2022 मध्ये भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) सहकार्याने वैद्यकीय संशोधनाच्या भारतीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या विश्लेषणाचा वापर केला गेला, पण त्यात एक पाऊल पुढे जाऊन चुकीचे विधान केले गेले. त्यात नमूद केले होते की 2017 नंतरची आकडेवारी सार्वजनिकपणे उपलब्ध नाही आणि त्यामुळे अलीकडील प्रवृत्तीचा अभ्यास शक्य नाही. या अहवालात सरकारशी संलग्न संशोधकांनी स्पष्टपणे लिहिले की “2017 नंतरची माहिती उपलब्ध नाही” आणि त्यासाठी एकमेव स्रोत म्हणून ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचा अहवाल दिला. मात्र ही गोष्ट वस्तुस्थितीला धरून नाही.

    या गोंधळाचे एक कारण म्हणजे सार्वजनिकपणे आकडेवारी उपलब्ध होण्यात झालेला बदल. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या जुन्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली माहिती 2019 पर्यंत मोठ्या प्रमाणावर वापरली गेली होती. त्यानंतर त्यातील काही भाग आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या (DGHS) संकेतस्थळावर दिसू लागला. परंतु वर्षनिहाय राष्ट्रीय आकडे व अनुसूचित जाती-जमाती यांचे विभाजन हे अजूनही आरोग्य मंत्रालयाच्या वार्षिक अहवालांमध्ये सातत्याने प्रकाशित होत राहिले. विखुरलेली मांडणी म्हणजे माहितीच नाही असे नाही, पण त्याच मंत्रालयातील विभागांनाही ती माहिती एकत्रितरीत्या मिळवता येत नव्हती. अशा परिस्थितीत भारताने 2027 पर्यंत “शून्य संक्रमण” साध्य करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी आरोग्य यंत्रणेने सर्व प्रकरणे शोधणे, उपचार करणे, लपलेले रुग्ण उघड करणे तसेच सर्व संपर्कांना प्रतिबंधक औषधोपचार व रोगप्रतिबंधक उपाय पुरवणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर हा लेख नवी माहिती वापरून आधीच्या विश्लेषणाचे अद्यतन करण्याचा प्रयत्न करतो.

    2018 नंतरची प्रगती आणि धोरणातील बदल

    गेल्या सहा वर्षांत अधिकृत धोरण अधिक कठोर झाले आहे. भारताने 2023–2027 या कालावधीसाठी राष्ट्रीय धोरणात्मक योजना व मार्गनकाशा तयार केला आहे, जो जागतिक आरोग्य संघटनेच्या 2021–2030 या दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजारांच्या आराखड्याशी सुसंगत आहे. या योजनेचे उद्दिष्ट 2027 पर्यंत शून्य संक्रमण साध्य करणे आहे. या योजनेत लवकर ओळख, संपर्क शोधणे आणि संपर्कांनंतर प्रतिबंधक उपचार यावर दुप्पट भर देण्यात आला आहे. तसेच राज्य, जिल्हा आणि उपजिल्हा स्तरावर टप्प्याटप्प्याने निर्मूलनाची खात्री करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

    कुष्ठरोग शोध मोहीम (LCDC) ही लपलेली प्रकरणे समोर आणण्यासाठी तयार करण्यात आली होती. पहिल्या दोन वर्षांत या मोहिमेत सुमारे 67,000 नवीन रुग्ण आढळले, जे अन्यथा त्या काळात निदान झाले नसते.

    कार्यक्रम स्तरावर भारताने 2016 मध्येच सक्रिय शोधाची पद्धत पुन्हा सुरू केली होती आणि 2017 मध्ये ती वाढवली. लपलेली प्रकरणे उघड करण्यासाठी ही मोहीम उपयुक्त ठरली. पहिल्या दोन वर्षांत सुमारे 67,000 रुग्ण सापडले. सक्रिय तपासणी आणि नंतर राष्ट्रीय योजनेतील संपर्क शोध व औषधोपचार यामुळे अल्पकालीन काळात नवीन प्रकरणे जास्त प्रमाणात सापडली. यामध्ये कोविड-19 ने आणखी व्यत्यय आणला. 2020–21 मध्ये देशभरातील नवीन प्रकरणे घसरून 65,147 झाली आणि नंतर सेवांचा पुनरारंभ झाल्यावर पुन्हा वाढली.

    स्थिर झालेली संख्या आणि निर्मूलनातील अडथळे

    राष्ट्रीय स्तरावर निर्मूलनाचे उद्दिष्ट पूर्ण होऊन 20 वर्षे झाली तरीही, भारतातील 36 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांपैकी फक्त 31 ठिकाणीच प्रति 10,000 लोकसंख्येमागे 1 पेक्षा कमी रुग्णांचा निकष पूर्ण झाला आहे. देशातील 759 जिल्ह्यांपैकी 630 म्हणजेच 83.0 टक्के जिल्ह्यांनीच हा टप्पा गाठला आहे. तुलनेत 2019 मध्ये 32 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी हा निकष पूर्ण केला होता. त्या वेळी देशातील 708 जिल्ह्यांपैकी 588 जिल्ह्यांनी निर्मूलन दर्जा गाठला होता, म्हणजेच प्रगती थांबलेली दिसते.

    अलीकडच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसते की नवीन प्रकरणांची संख्या 2027 पर्यंतच्या “शून्य संक्रमण” उद्दिष्टाशी सुसंगतरीत्या कमी होत नाही. महामारीनंतर घसरलेली संख्या पुन्हा पूर्वीच्या पातळीवर आली आहे. 2023–24 मध्ये नवीन प्रकरणे 107,851 इतकी नोंदली गेली. मागील 15 वर्षांत प्रकरणांची संख्या फारशी घटलेली नाही. याचा अर्थ नेहमीच संक्रमण वाढले आहे असे नाही; काही जिल्ह्यांत अधिक तपासणीमुळे दुर्लक्षित प्रकरणे समोर आली असतील. तरीदेखील राष्ट्रीय स्तरावर संकेत स्पष्ट आहे. आजार नियंत्रणाचा वेग अपेक्षित पातळीवर नाही. राज्यांपासून जिल्हा व तालुका स्तरावर निर्मूलनाची खात्री करण्यासाठी भारताने लवकर तपासणी कायम ठेवली पाहिजे आणि विशेषतः बालरुग्णांचे प्रमाण तसेच उशिरा निदानामुळे उद्भवणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील अपंगत्वाची संख्या कमी करणे आवश्यक आहे.

    India S Leprosy Challenge Slow Gains And Lingering Inequities

    स्रोत : आरोग्य मंत्रालयाचे अनेक वार्षिक अहवाल, पत्र माहिती विभागाच्या प्रसिद्धीपत्रके व संसदेमधील उत्तरे, लेखकाने संकलित व विश्लेषित केलेले.

    याशिवाय, 2018-19 मध्ये ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या विश्लेषणात अधोरेखित केलेला असमानतेचा मुद्दा आजही टिकून आहे आणि अधिक गंभीर झाला आहे. म्हणजेच 2023–24 या वर्षातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या एकत्रित लोकसंख्येत नवीन प्रकरणांचा वाटा सुमारे 37.3 टक्के आहे. हा आकडा 2008–09 मध्ये 32.7 टक्के होता आणि त्यांच्या एकत्रित लोकसंख्या वाट्यापेक्षा (सुमारे 25.2 टक्के) खूप जास्त आहे. हा ताज्या वार्षिक अहवालांतील वर्षनिहाय आकडेवारीशी जुळतो, ज्यात मागील काही वर्षांत हा टक्का सातत्याने 36 ते 38 दरम्यान फिरताना दिसतो.

    India S Leprosy Challenge Slow Gains And Lingering Inequities

    स्रोत : आरोग्य मंत्रालयाचे वार्षिक अहवाल, पत्र माहिती विभागाच्या प्रसिद्धीपत्रके व संसदेमधील उत्तरे, लेखकाने संकलित व विश्लेषित केलेले.

    राष्ट्रीय धोरणात्मक योजनेत योग्य उपाय सुचवले आहेत- संपर्क शोध, प्रतिबंधक औषधोपचार, आणि प्राथमिक आरोग्य तपासणीचे एकत्रीकरण. यामुळे निदान न झालेल्या रुग्णांची संख्या कमी होईल अशी अपेक्षा आहे. तरीदेखील, विद्यमान संशोधनात नमूद केलेले अनेक अडथळे दुर्गम भाग, स्थलांतर, कलंक, आदिवासी भागातील उपचार घेण्यात होणारा उशीर, एकत्रीकरणानंतर कर्मचाऱ्यांचा अनुभव कमी होणे, तसेच अधूनमधून होणारी मोहिमाधारित तपासणी, हे या योजनेच्या परिणामांना मर्यादा आणू शकतात. राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील उद्दिष्ट साध्य करायचे असल्यास गती देणारे उपाय अपरिहार्य आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर (उर्वरित लोकसंख्या) यांच्या प्रमाणातील बदलाचा मागोवा घेतल्यास (आकृती 3) गंभीर चित्र समोर येते. अनुसूचित जमातींचा नवीन प्रकरणांतील वाटा 2008–09 मध्ये 13.3 टक्क्यांवरून 2023–24 मध्ये 20.01 टक्क्यांवर गेला आहे, जेव्हा त्यांच्या लोकसंख्येतील वाटा फक्त 8.6 टक्के आहे. याच कालावधीत अनुसूचित जाती व इतरांमधील प्रकरणांचे प्रमाण किंचित कमी झाले आहे.

    India S Leprosy Challenge Slow Gains And Lingering Inequities

    स्रोत : आरोग्य मंत्रालयाचे वार्षिक अहवाल, पत्र माहिती विभागाच्या प्रसिद्धीपत्रके व संसदेमधील उत्तरे, लेखकाने संकलित व विश्लेषित केलेले.

    जर देशात एकूण नवीन प्रकरणांची संख्या या कालावधीत मोठ्या प्रमाणात कमी झाली असती, तर ही वाढ फक्त आकडेवारीच्या बदलत्या वितरणामुळे आहे असे म्हणता आले असते. विशेषतः जेव्हा सक्रिय तपासणीमुळे दुर्गम व वंचित भागातील प्रकरणे पुढे आली. परंतु प्रत्यक्ष प्रकरणांच्या आकडेवारीकडे पाहिल्यास चित्र वेगळे दिसते (आकृती 1). 2008–09 ते 2023–24 या काळात अनुसूचित जमातींतील नवीन प्रकरणांची संख्या सातत्याने वाढली आहे. सुरुवातीला 17,846 होती व सध्या 21,582 झाली आहे (आकृती 4). याउलट अनुसूचित जाती व इतर लोकसंख्येतील प्रकरणे याच कालावधीत मोठ्या प्रमाणात घटली आहेत. देशाच्या एकूण लोकसंख्येत अनुसूचित जातींचा वाटा 16.6 टक्के असूनही सध्या त्यांच्या तुलनेत अनुसूचित जमातींतील नवीन कुष्ठरोग प्रकरणे जास्त आहेत, जरी त्यांचा लोकसंख्या वाटा फक्त 8.6 टक्के आहे.

    India S Leprosy Challenge Slow Gains And Lingering Inequities

    स्रोत : लेखकाने संकलित केलेली माहिती—आरोग्य मंत्रालयाचे वार्षिक अहवाल, पत्र माहिती विभागाच्या प्रसिद्धीपत्रके आणि संसदेमधील उत्तरे.

    अनेक वर्षांपासून भारतातील अनेक कुष्ठरोग बाधित जिल्ह्यांना वामपंथी अतिवाद (LWE) ची समस्या देखील होती, जिथे असुरक्षा आणि दुर्गम भूप्रदेशामुळे नियमित सेवा, संपर्क शोध व उपचाराचे पालन यामध्ये अडथळे आले. मात्र गेल्या दहा वर्षांत LWE खूपच कमी झाले आहे (आकृती 5), ज्यामुळे सक्रिय प्रकरण शोध मोहिमा आणि संपर्क-आधारित प्रतिबंधक औषधोपचार पूर्वीपेक्षा खोलवर जाऊ शकतात. तरीही असमानतेचा मुद्दा पुरेसा बदललेला नाही: अनुसूचित जमाती व थोड्या प्रमाणात अनुसूचित जातींचा नवीन प्रकरणांतील वाटा अजूनही जास्त आहे, हे दर्शवते की सुधारित प्रवेशामुळे मिळालेले लाभ त्यांना पूर्णपणे मिळत नाहीत ज्यांना सर्वाधिक गरज आहे. धोरणात्मक प्रतिसाद आता नेमके सुधारक असायला हवा. यामध्ये असमानता लक्षात घेऊन सूक्ष्म नियोजन, विश्वासार्ह स्थानिक कर्मचारी व वाहतूक, खासगी क्षेत्रातील जागरूकता वाढवणे, तसेच संपर्क व्यवस्थापन यांचा समावेश असणे आवश्यक आहे, जेणेकरून सुरक्षेचा लाभ लवकर निदान व कमी नवीन संसर्गात रूपांतरित होईल.

    India S Leprosy Challenge Slow Gains And Lingering Inequities

    स्रोत : लेखकाने संकलित केलेली माहिती- पत्र माहिती विभागाची प्रसिद्धीपत्रके.

    “कुष्ठरोगमुक्त” भारताकडे वाटचाल

    राष्ट्रीय उद्दिष्टाकडे खरोखरच प्रगती करण्यासाठी भारताने आरोग्य यंत्रणेचे साधनसूत्र योग्य पद्धतीने वापरले पाहिजे. सर्वप्रथम, सक्रिय प्रकरण शोध हा प्रकरण कमी करण्याचा सेतु म्हणून पाहिला जाऊ शकतो, पण केवळ तेच नाही तर उपचार पूर्ण होणे, पुनरागमन तपासणी आणि संपर्कांमध्ये मजबूत प्रतिबंधक औषधोपचार यांसोबत जोडले गेले पाहिजे. अन्यथा प्रकरण शोध हे एक सतत चालणारे चक्र बनते; अधिक शोध घेतले तरी जास्त रुग्ण आढळतात, पण संक्रमणावर फरक पडत नाही.

    सर्वप्रथम, सक्रिय प्रकरण शोध हा प्रकरण कमी करण्याचा सेतु म्हणून पाहिला जाऊ शकतो, पण केवळ तेच नाही तर उपचार पूर्ण होणे, पुनरागमन तपासणी आणि संपर्कांमध्ये मजबूत प्रतिबंधक औषधोपचार यांसोबत जोडले गेले पाहिजे.

    दुसरे, आकडेवारीची पारदर्शकता हा किरकोळ प्रशासकीय तपशील नाही. जुने राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम संकेतस्थळ बंद झाल्यामुळे आणि त्याचे कमी उपलब्ध, वापरायला कठीण प्रतिस्थापनामुळे ICMR लेखकांनाही 2017 नंतरची माहिती उपलब्ध नसल्याचे वाटले. सक्रिय प्रकरण शोध हा प्रकरण कमी करण्याचा सेतु म्हणून पाहिला जाऊ शकतो, पण केवळ उपचार पूर्ण होणे, पुनरागमन तपासणी आणि संपर्कांमध्ये मजबूत प्रतिबंधक औषधोपचार यासोबत जोडले पाहिजे. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम  अंतर्गत आधुनिक, सुलभ सार्वजनिक डेटा पोर्टल पुनर्स्थापित करणे, राज्यनिहाय विभाजित प्रकरणे, सामाजिक-आर्थिक गट, बालरुग्ण व अपंगत्व निर्देशक, तसेच संपर्क शोध व प्रतिबंधक औषधोपचार याची माहिती शेअर करणे, संशोधक, राज्ये व जिल्ह्यांना त्रुटी लवकर शोधून सुधारणा करण्यास मदत करेल.

    डेटा पारदर्शकता अधिक महत्त्वाची झाली आहे कारण भारताने मे 2025 मध्ये कुष्ठरोगाला अधिसूचित आजार घोषित केले, ही फार महत्त्वाची घडामोड असूनही माध्यमांत कुठलाही उल्लेख नाही. यामुळे 2025–26 पासून खासगी क्षेत्रातील प्रकरणे अधिकृत डेटामध्ये येण्यास मार्ग मोकळा होतो. सक्रिय डेटा शेअरिंग व प्रभावी संवाद नसल्यास घबराट निर्माण होऊ शकते. तरीही काही सकारात्मक चिन्हे दिसतात. व्यावसायिक संघटनांनी कुष्ठरोग प्रशिक्षण व चर्चा पुन्हा सुरु केली आहे, ज्यामुळे तरुण त्वचारोगतज्ञ व डॉक्टर यांचा या आजाराशी पुन्हा संबंध दिसतो, हे ORF च्या पूर्वीच्या कामाच्या प्रवृत्तीपेक्षा स्पष्ट फरक आहे. यासोबत राष्ट्रीय धोरणात्मक योजनेतील मजबूत संपर्क शोध व प्रतिबंधक औषधोपचार संरचना जोडल्यास, प्रणाली खरोखरच वळण घेऊ शकते, जर अंमलबजावणी वेगाने झाली आणि डेटा सक्रियपणे शेअर झाला. तोपर्यंत, राज्यस्तरीय निर्मूलनाच्या दाव्यांना अवास्तव वाटेल.

    खरी पारदर्शकता, वेळेवर रुग्ण ओळख, अपंगत्व रोखण्याचे प्रयत्न आणि वंचित लोकांवर असलेला जास्त भार कमी करण्यासाठी प्रामाणिक धोरणांवर जोर दिला, तर ‘2027 पर्यंत शून्य संक्रमण’ हे फक्त घोषवाक्य न राहता प्रत्यक्षात येऊ शकणारी योजना बनेल. जेव्हा वंचित समाजांमध्ये रुग्णसंख्या वाढते, तेव्हा फक्त देखरेख सुधारली आहे असे सांगत राहून ‘आधी वाईट दिसते, नंतर सुधारते’ असे म्हणणे योग्य नाही. कारण हे लोक खूप काळापासून प्रतीक्षा करत आहेत.


    ओमन सी कुरियन हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन येथे सिनियर फेलो आणि हेल्थ इनिशिएटिव्हचे प्रमुख आहेत.

    The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.