पोषण पखवाडा 2026 मध्ये मुलांच्या आयुष्यातील पहिल्या 1000 दिवसांवर भर दिला जात असताना, भारताने केवळ पोषण सेवा उपलब्ध करून देण्यापेक्षा त्यांच्या प्रत्यक्ष परिणामांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. यासाठी पौष्टिक आहाराची गुणवत्ता, पूरक आहाराची योग्य पद्धत आणि दीर्घकालीन वर्तनात्मक बदलांना प्राधान्य देणं अत्यावश्यक ठरणार आहे.
भारत पोषण पखवाडा 2026 साजरा करत असताना, गर्भधारणेपासून मुलाच्या दुसऱ्या वाढदिवसापर्यंतच्या पहिल्या 1000 दिवसांवर केंद्रित झालेला राष्ट्रीय भर प्रगतीचे पुनरावलोकन करण्याची आणि प्राधान्यक्रम अधिक स्पष्ट करण्याची महत्त्वाची संधी देतो. हा कालावधी मानवी भांडवल निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण तो केवळ बालकाच्या जगण्यावरच नव्हे तर संज्ञानात्मक विकास, शैक्षणिक परिणाम आणि दीर्घकालीन उत्पादकतेवरही प्रभाव टाकतो. गेल्या दशकात भारताने सेवा वितरणाचा विस्तार आणि संस्थात्मक व्यवस्था मजबूत करण्यात सातत्यपूर्ण प्रगती केली आहे. पुढील टप्प्यातील प्रगती ही आहाराच्या गुणवत्तेत सुधारणा, वर्तनात्मक बदल अधिक सखोल करणे आणि या प्रगतीचा लाभ सर्वाधिक असुरक्षित घटकांपर्यंत पोहोचवणे यावर अवलंबून असेल.
भारताचा प्रवास समजून घेण्याचा एक उपयुक्त मार्ग म्हणजे पहिल्या 1000 दिवसांकडे मातृ आरोग्य, शिशु आहार, आहारातील विविधता आणि संगोपनाच्या वातावरणाचा समावेश असलेल्या सलग प्रक्रियेच्या रूपात पाहणे. या प्रत्येक टप्प्यावर सार्वजनिक व्यवस्थांनी आपला विस्तार वाढवला आहे. आता पुढे जे चित्र समोर येत आहे ते म्हणजे केवळ प्रवेशावर नव्हे, तर गुणवत्ता आणि प्रत्यक्ष परिणामांवर भर देणारी दुसऱ्या पिढीची कार्यसूची.
गेल्या दशकात भारताने सेवा वितरणाचा विस्तार आणि संस्थात्मक व्यवस्था मजबूत करण्यात सातत्यपूर्ण प्रगती केली आहे. पुढील टप्प्यातील प्रगती ही आहाराच्या गुणवत्तेत सुधारणा, वर्तनात्मक बदल अधिक सखोल करणे आणि या प्रगतीचा लाभ सर्वाधिक असुरक्षित घटकांपर्यंत पोहोचवणे यावर अवलंबून असेल.
मातृ आरोग्य हा अजूनही या प्रक्रियेचा मुख्य प्रवेशबिंदू आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातील (NFHS 5, 2019 ते 21) आकडेवारीनुसार, गर्भावस्थेपूर्व आणि गर्भावस्थेतील आरोग्यसेवा वापरात सुधारणा दिसून येते, जी आरोग्य व्यवस्थांशी वाढलेल्या सहभागाचे प्रतिबिंब आहे. मात्र, प्रजननक्षम वयोगटातील महिलांमधील उच्च प्रमाणातील अशक्तपणा अजूनही परिणामांवर मर्यादा आणतो. यामुळे सेवा वितरणासोबतच आहारातील विविधता आणि सूक्ष्मपोषक पूरकता यांसारख्या अधिक मजबूत पोषणकेंद्रित हस्तक्षेपांची गरज अधोरेखित होते.
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या घरगुती उपभोग खर्च सर्वेक्षणांवर (HCES, 2022 ते 23 आणि 2023 ते 24) आधारित अलीकडील पुरावे या चर्चेला एक महत्त्वपूर्ण परिमाण जोडतात. सरासरी कॅलरी सेवन मोठ्या प्रमाणात पुरेसे असले तरी, आहार पद्धती अजूनही असमतोल आहेत. धान्यांवर सातत्यपूर्ण अवलंबित्व आणि कडधान्ये, फळे व भाज्या यांसारख्या पोषणमूल्यांनी समृद्ध अन्नपदार्थांचे अपुरे सेवन कायम आहे. हे निष्कर्ष अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यापासून आहाराच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याकडे धोरणात्मक बदलाची गरज दर्शवतात.
उत्साहवर्धक बाब म्हणजे, प्रारंभीच्या आहार पद्धती दर्शवतात की सातत्यपूर्ण धोरणात्मक लक्ष परिणामकारक ठरू शकते. स्तनपान पद्धतींमध्ये झालेली सुधारणा ही राष्ट्रीय उपक्रम आणि पोषण अभियानांतर्गत समुदाय स्तरावरील सहभाग यांच्या एकत्रित परिणामांचे प्रतिबिंब आहे. बालकांचे जगणे आणि संज्ञानात्मक विकास सुधारण्यात स्तनपानाचा मजबूत संबंध असल्याचे पुरावे लक्षात घेता, ही प्रगती महत्त्वाची ठरते. त्याचवेळी, विशेषतः असंघटित क्षेत्रातील महिलांसाठी असलेले संरचनात्मक अडथळे अजूनही आहार पद्धतींवर परिणाम करत आहेत, ज्यामुळे मातृत्व संरक्षण आणि कार्यस्थळी सहाय्य यांसारख्या समर्थक धोरणांची गरज अधोरेखित होते.
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या घरगुती उपभोग खर्च सर्वेक्षणांवर (HCES, 2022 ते 23 आणि 2023 ते 24) आधारित अलीकडील पुरावे या चर्चेला एक महत्त्वपूर्ण परिमाण जोडतात.
पूरक आहार हा अजूनही अधिक गती देण्याची गरज असलेला सर्वात महत्त्वाचा क्षेत्र आहे. NFHS 5 च्या आकडेवारीनुसार, 6 ते 23 महिन्यांच्या मुलांपैकी केवळ मर्यादित प्रमाणातील मुलांना किमान स्वीकारार्ह आहार मिळतो. ही तफावत आर्थिक मर्यादा, मर्यादित आहार विविधता, संगोपनासाठी उपलब्ध वेळेची कमतरता आणि खोलवर रुजलेल्या आहार पद्धती अशा अनेक घटकांच्या एकत्रित परिणामांचे प्रतिबिंब आहे. स्थानिक पातळीवर उपलब्ध पोषणयुक्त अन्नपदार्थ आणि सुधारित आहार पद्धतींवर पोषण पखवाड्याने दिलेला भर हा बालपोषण सुधारण्याच्या घटकांवरील पुराव्यांशी सुसंगत आहे.
भारताचे अन्नपर्यावरण देखील वेगाने बदलत आहे. NSSO उपभोग आकडेवारीनुसार, आहारात हळूहळू विविधता वाढत असली तरी प्रक्रिया केलेल्या आणि पॅकेज्ड अन्नपदार्थांच्या वाढत्या वापराचाही प्रभाव दिसून येतो. हे बदलते वातावरण नवीन जोखीमे निर्माण करत आहे, ज्यामुळे कुपोषणाचा दुहेरी भार तयार होत आहे. अशा परिस्थितीत अल्पपोषणासोबतच वाढते स्थूलत्व आणि आहाराशी संबंधित असंसर्गजन्य रोगही एकाचवेळी दिसून येत आहेत.
IYCF निर्देशकांमधील सुधारणा या प्रमाणाबाहेर अधिक संपन्न आणि अधिक शिक्षित कुटुंबांमध्ये केंद्रित आहेत. सर्वात खालच्या संपत्ती गटांतील मुलांना अजूनही पुरेशा आहार आणि संगोपनाचा लक्षणीयरीत्या कमी प्रवेश आहे. प्रादेशिक तफावताही तितक्याच स्पष्ट आहेत. केरळ आणि तामिळनाडूसारखी राज्ये बहुतेक निर्देशकांमध्ये इतरांपेक्षा चांगली कामगिरी करत असताना, अनेक मध्य आणि पूर्वेकडील राज्ये अजूनही मागे आहेत. ही असमान प्रगती एकसमान राष्ट्रीय दृष्टिकोनांपेक्षा संदर्भविशिष्ट धोरणांची गरज अधोरेखित करते.
धोरणात्मक पातळीवर भारताने आधीच या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. पोषणाला प्रारंभिक उत्तेजन, प्रतिसादात्मक संगोपन आणि आरोग्याशी एकत्रित करणाऱ्या ‘नर्चरिंग केअर’ चौकटीकडे झालेला कल हा बदलत्या जागतिक आणि राष्ट्रीय विचारसरणीचे प्रतिबिंब आहे. सक्षम अंगणवाडी आणि पोषण ट्रॅकर यांसारखे उपक्रम सेवा वितरण आणि निरीक्षण अधिक मजबूत करण्यास मदत करत आहेत, तर पोषण पखवाड्यासारख्या मोहिमा मोठ्या प्रमाणावर वर्तनात्मक बदलांना बळ देत आहेत.
IYCF निर्देशकांमधील सुधारणा या प्रमाणाबाहेर अधिक संपन्न आणि अधिक शिक्षित कुटुंबांमध्ये केंद्रित आहेत. सर्वात खालच्या संपत्ती गटांतील मुलांना अजूनही पुरेशा आहार आणि संगोपनाचा लक्षणीयरीत्या कमी लाभ मिळत आहे.
पुढे पाहता, तीन प्राधान्यक्रम विशेषतः ठळकपणे समोर येतात :
पहिले, आहाराच्या गुणवत्तेत सुधारणा करणे हे धोरणात्मक प्रयत्नांचे केंद्रबिंदू बनले पाहिजे. कॅलरीची पुरेशी उपलब्धता सुधारली असली तरी, NSSO आकडेवारी आहारातील विविधता आणि सूक्ष्मपोषक सेवनातील सातत्यपूर्ण तफावत अधोरेखित करते.
दुसरे, पूरक आहाराला बालपोषण धोरणांचा मुख्य आधारस्तंभ म्हणून अधिक महत्त्व दिले पाहिजे, ज्यासाठी पुरवठा आधारित हस्तक्षेप आणि वर्तनात्मक बदल संवाद या दोन्हींचा आधार आवश्यक आहे.
तिसरे, सातत्यपूर्ण वर्तनात्मक बदल हा कार्यक्रम रचनेच्या केंद्रस्थानी राहिला पाहिजे. पुरावे दर्शवतात की पोषण परिणामांतील सुधारणा केवळ सेवांपर्यंतच्या प्रवेशावर अवलंबून नसून संगोपन पद्धती, सामाजिक नियम आणि घरगुती निर्णयप्रक्रियांवरही अवलंबून असतात.
पहिल्या 1000 दिवसांदरम्यान पोषण सुधारण्यासाठी भारताने एक मजबूत पाया उभारला आहे. पोषण पखवाडा 2026 या कार्यसूचीला नव्याने गती देत असताना, आता लक्ष परिणाम अधिक सखोल करण्याकडे वळले पाहिजे, जेणेकरून प्रत्येक मुलाला केवळ सेवांपर्यंत प्रवेशच नव्हे तर सुधारित पोषण, संगोपन आणि विकासाचाही लाभ मिळेल. पहिले 1000 दिवस ही मर्यादित पण परिवर्तन घडवून आणणारी संधी आहे. सातत्यपूर्ण बांधिलकी, समुदाय आधारित कृती आणि राष्ट्रीय तसेच प्रादेशिक अनुभवांतून सातत्याने शिकण्याच्या प्रक्रियेमुळे, भारत या संधीचे रूपांतर अधिक निरोगी आणि अधिक उत्पादक भावी पिढी घडविणाऱ्या दीर्घकालीन परिवर्तनात करण्यासाठी सक्षम स्थितीत आहे.
शोभा सुरी या 'ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन'च्या 'हेल्थ इनिशिएटिव्ह'मध्ये वरिष्ठ फेलो (Senior Fellow) आहेत.
रोहिणी सारन या 'सार्वजनिक आरोग्य पोषण' (Public Health Nutrition) आणि 'सीएसआर' (CSR) तज्ज्ञ आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Dr. Shoba Suri is a Senior Fellow with ORFs Health Initiative. Shoba is a nutritionist with experience in community and clinical research. She has worked on nutrition, ...
Read More +
With 18 years of experience, Rohini Saran leads nutrition-sensitive programs focused on maternal and child health across diverse sectors. Expertise in strategic communications, policy advocacy, ...
Read More +